देशभरात सध्या १ लाख ३० सहस्र ५८९ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग !

नवी देहली – देशभरात १२ जुलै या दिवशी १६ सहस्र १०७ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद करण्यात आली. ११ जुलैच्या तुलनेत ही संख्या ५ सहस्र ३९२ हून अधिक आहे. तसेच गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुळे मृतांचा आकडा १७ वरून ४५ वर पोचला आहे. सध्या देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३० सहस्र ५८९ झाली आहे, तर १२ जुलै या दिवशी १५ सहस्र ७० नागरिक कोरोनामुक्त झाले झाले.

बंगालमध्ये सर्वाधिक रुग्ण !

देशभरात बंगालमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या २४ घंट्यांत येथे २ सहस्र ६५९ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. येथे १२ जुलै या दिवशी ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून प्रत्येक १०० नागरिकांमागे १८ रुग्णांना संसर्ग होत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ !

बंगालनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या २४ घंट्यांत महाराष्ट्रात कोरोनाचे २ सहस्र ४३५ रुग्ण आढळले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये सर्वाधिक मृत्यू !

देशात सर्वाधिक मृत्यू केरळ राज्यामध्ये झाले आहेत. गेल्या २४ घंट्यांत १७ जण कोरोनाला बळी पडले आहेत.