आता गुळणीद्वारे कोरोनाची चाचणी करता येणार !

या पद्धतीमध्ये ३ घंट्यांमध्ये कोरोनाच्या चाचणीचा अहवाल कळतो. ‘सलाईन गार्गल आर्टी-पीसीआर्’ असे या पद्धतीचे नाव आहे.

राज्यातील दळणवळणबंदीच्या निर्बंधांमध्ये १५ जूनपर्यंत वाढ ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात ‘कोरोनामुक्त गाव’ ही मोहीम राबवण्याची, तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे दायित्व शासन घेणार असल्याचे या वेळी उद्धव ठाकरे यांनी घोषित केले.

सहकार्य केल्यास परमबीर सिंह यांना ९ जूनपर्यंत अटक करणार नाही ! – राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात भूमिका

ठाणे पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या अन्वेषणामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सहकार्य केल्यास त्यांना ९ जूनपर्यंत अटक करण्यात येणार नाही, असे म्हणणे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे.

‘श्री अन्नपूर्णा स्तोत्र पाठांतर स्पर्धे’त मुंबई येथील सनातनची बालसाधिका कु. योगिनी श्रीपाद सामंत (वय ७ वर्षे) हिचा प्रथम क्रमांक !

स्पर्धेच्या परीक्षक सौ. श्रद्धा कोटस्थळे यांनी कु. योगिनीचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘योगिनीची वेशभूषा चांगली होती. आवाजाची लय आणि नाद तसाच ठेवून अतिशय उत्कृष्ट चालीमध्ये शांतपणे अन् स्पष्टपणे योगिनीने सादरीकरण केले.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा आलेख घसरला !

राज्यात काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा आलेख घसरत चालला आहे. ५० ते ६० सहस्रांपर्यंत पोचलेली रुग्णसंख्या आता ३० सहस्रांपर्यंत खाली आली आहे.

भारतातील आत्महत्यांची संख्या चिंताजनक !

नॅशनल क्राईम ब्युरो’च्या आकडेवारीनुसार मुंबईतील आत्महत्यांच्या घटनांमध्ये ७.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात १५ ते २९ वर्षे वयोगटांतील व्यक्तींच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे.

वैद्यकीय परीक्षा रहित होणार नाही, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे ! – अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री

अमित देशमुख पुढे म्हणाले, ‘‘मागच्या वर्षी कोरोनाचे संकट असतांनाही महाराष्ट्र आरोग्य विद्यापिठाने परीक्षा यशस्वीरित्या घेतली. या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडल्या. यावर्षी १० जूनपासून वैद्यकीय परीक्षा चालू होणार आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती !

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे पत्र लिहिल्यावरच त्यांच्या विरोधात गुन्हे कसे नोंदवले गेले ? याचे उत्तर आम्हाला द्या, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

‘‘तुम्ही आमचा अपमान करत आहात !’’ – खासदार संजय राऊत यांची राज्यपालांवर टीका

विधान परिषदेत १२ राज्यपालनियुक्त सदस्यांची निवड करण्यासाठी राज्यशासनाने मागील वर्षी १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह यांच्याकडे पाठवली आहेत; मात्र राज्यपालांनी ती अद्याप संमत केलेली नाहीत.

मुंबईत लोकल रेल्वेने अधिवक्त्यांना प्रवासाची अनुमती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

लोकलमध्ये गर्दी झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने राज्यशासनाने निर्बंध ठेवले आहेत, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने लोकल रेल्वेगाड्यांमधून अधिवक्त्यांना प्रवास करण्याची अनुमती नाकारली आहे.