‘टीआरपी’ घोटाळा प्रकरणीच्या आरोपपत्रातून अर्णव गोस्वामी आणि दासगुप्ता यांचे अनेक आक्षेपार्ह संवाद उघड

गुन्हे अन्वेषण शाखेने प्रविष्ट केलेल्या या आरोपपत्रात ५०० पाने गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्या ‘चॅट’चीच आहेत. या संवादातून गोस्वामी यांना पुलवामा आक्रमण आणि एअर स्ट्राईक याची पूर्वकल्पना असल्याचे पुढे येत आहे.

३१ जानेवारी पूर्वी लाभार्थी शिधापत्रिकेवरील सर्व व्यक्तींचे आधार सिडींग करण्यात येणार ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ई-केवायसी आणि मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार आणि भ्रमणभाष क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.

एकाच व्यक्तीने दोनदा विवाहनोंदणी केल्याप्रकरणी चौकशी करण्याची महिला काँग्रेसची मागणी

या प्रकरणी विवाहनोंदणी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी लाच घेऊन विवाह प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी केला आहे.

रेल्वेच्या अवैध तिकीटविक्री प्रकरणी तीन दलालांना अटक

मुंबईमध्ये मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची अनधिकृत विक्री करणार्‍या तीन दलालांना अटक करून त्यांच्याकडून ४०० ई-तिकिटे हस्तगत करण्यात आली आहेत. हस्तगत केलेल्या तिकिटांचे एकूण मूल्य ६ लाख रुपयांहून अधिक आहे.

मास्क न वापरणार्‍यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गोव्यातील जनतेची मागणी

सध्या गोव्यात अनेक पर्यटक येत आहेत. कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर मास्क वापरण्यासंबंधीचे नियम अनेक पर्यटक आणि काही स्थानिक पाळत नसल्याने मास्क न वापरणार्‍यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी गोव्यातील बहुतांश नागरिकांकडून होत आहे.

न्यायसंस्थेवर अतिक्रमण करणारी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी आणि तिला प्रखर विरोध करणारे कणखर न्यायमूर्ती !

आणीबाणीला आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यशैलीला विरोध करणाऱ्या न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, शेलाट, ग्रोवर, हेगडे आणि खन्ना यांचे नाव आजही आदराने घेतले जाते !

शेतकरी आंदोलनाची स्थिती तबलिगी जमातसारखी होऊ नये !  

न्यायालयाला अशी चिंता व्यक्त करावी लागते, याला पोलीस, प्रशासन आणि शेतकरी उत्तरदायी आहेत ! सामान्य लोकांकडून दंड वसूल करणारे प्रशासन आणि पोलीस येथे गांधी यांच्या माकडांप्रमाणे कृती करत आहेत, तसेच नियम भंग करणारे शेतकरीही जनताविरोधी कृती करत आहेत !

बचतगटांच्या २२ लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी दोन बचतगटाच्या तीन महिलांना पोलीस कोठडी 

शासनाकडून बचतगटांना काम दिले जाते तसेच त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो, असे असतांना भ्रष्टाचार करून बचतगटाच्या मूळ संकल्पनेलाच सुरूंग लावणार्‍यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखा ! 

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज पोलीस ठाणे आणि  प्रांत कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे सरकारीकरण झाल्यानंतर वाढलेले अपप्रकार आणि गैरव्यवहार !

पंढरपूरचे देवस्थान सरकारच्या कह्यात गेले. आय.ए.एस्. असलेल्या कार्यकारी अधिकार्‍याने मंदिरातील संतांची समाधी कट्टा समजून पाडली, पंढरीच्या प्रसादात पालट केला. एका अधिकाऱ्याने देवीला आलेल्या वस्तू पळवल्या. असे गैरप्रकार होत आहेत.