ज्येष्ठ नागरिकांना एस्.टी. प्रवासासाठी ओळखपत्राऐवजी आता ‘स्मार्ट कार्ड’ बंधनकारक

कोरोना संसर्गाची दुसरी लाट, तसेच महामंडळातील कर्मचार्‍यांचा संप यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ प्राप्त करून घेण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने ३०० गाड्यांचे नियोजन !

६ ते १४ जुलै या कालावधीत पंढरपूर येथे आषाढी यात्रा होत असून १० जुलै हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. आषाढी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गावांतील भाविक पंढरपूर येथे प्रवास करतात.

एस्.टी.च्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ !

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा असल्यामुळे यात्रेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये; म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२२ पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक केले जाणार आहे.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे ४ तात्पुरत्या बसस्थानकांची उभारणी चालू ! – विलास राठोड, विभाग नियंत्रक

यात्रेच्या कालावधीत महामंडळाचे १० ते ११ सहस्र कर्मचारी पंढरपूर येथे कार्यरत असणार ! अस्थायी स्थानके आणि तेथे येणाऱ्या विविध जिल्ह्यांतील बसगाड्यांचे नियोजन

पुण्यात धावली परिवहन मंडळाची पहिली विद्युत् एस्.टी. ‘शिवाई’ !

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पणानिमित्त स्वारगेट एस्.टी. बस स्थानक येथे परिवहन मंडळ, पुणे विभागाच्या ‘शिवाई’ या बससेवेचा शुभारंभ, तसेच विद्युत् प्रभारक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लूटमार रोखण्यात परिवहन विभाग उदासीन !

परिवहन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी कि खासगी ट्र्रॅव्हल्स्च्या फायद्यासाठी ?

उत्पन्न वाढीसाठी बसस्थानकांच्या जागा भाड्याने देण्यासाठी एस्.टी. महामंडळ सर्वेक्षणाच्या सिद्धतेत !

आर्थिक स्थिती खालावल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी एस्.टी. महामंडळाकडून प्रयत्न चालू आहेत. या अंतर्गत बसस्थानकांच्या मोक्याच्या कोणत्या जागा भाड्याने देता येतील ? याविषयी सर्वेक्षण चालू आहे.

सोलापूर बसस्थानकात बसगाड्यांची कोंडी !

सांगली, लातूर, कोल्हापूर, कोकण, पुणे यांसह कर्नाटक येथे जाणार्‍या बसगाड्या मोठ्या प्रमाणात सोलापूर बसस्थानकातून जातात. याचसमवेत पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर येथील तीर्थक्षेत्रांना जाणार्‍या बसगाड्यांची संख्याही अधिक आहे.

२२ एप्रिलपासून एस्.टी. बस पुन्हा पूर्ण क्षमतेने धावणार !

नोव्हेंबर २०२१ पासून एस्.टी.च्या कामगारांनी संप पुकारल्याने राज्याची जीवनवाहिनी ठरणारी एस्.टी. बस ठप्प झाली होती; मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर आतापर्यंत ७० सहस्र कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

सातारा आगारातून ९० टक्के बसगाड्या चालू !

सर्वाेच्च न्यायालयाने एस्.टी. कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर सातारा आगारातून ९० टक्के बसगाड्या चालू झाल्या आहेत. आगारातील ६५८ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती आगारप्रमुख रेश्मा गाडेकर यांनी दिली आहे.