खासगी ट्रॅव्हल्सकडून आकारल्या जाणार्‍या भाडेवाढीविरोधात परिवहन अधिकार्‍यांची ‘नागरिकांनी तक्रार करावी’, अशी अपेक्षा !

असे असले, तरी ज्या गोष्टी प्रशासनाला ठाऊक आहेत, त्याविषयी प्रशासन निष्क्रीय रहात असेल, तर प्रशासन नावाचा पांढरा हत्ती हवा कशाला ?

लातूर एस्.टी. विभागात २१ नवीन बसगाड्यांचे उद्घाटन !

एस्.टी. विभागात २१ नवीन बसगाड्यांचे उद्घाटन उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते करण्यात आले. अंबाजोगाई रस्त्यावरील बसस्थानक क्रमांक २ वर या नवीन बसगाड्यांचे स्वागत करण्यात आले.

संभाजीनगर परिवहन विभागाने ट्रॅव्हल्स मालकांना दिली भरमसाठ भाडे आकारण्याची अनुमती !

संभाजीनगरचा उपप्रादेशिक परिवहन विभाग अशा प्रकारे खासगी ट्रॅव्हल्ससाठी स्वतःच्या मनाने तिप्पट भाडेवाढ करण्याचे दरपत्रक काढू शकतो का ?

राज्यातील एस्.टी.च्या भाड्यात १० टक्क्यांची शुल्कवाढ लागू !

एकीकडे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट चालू असतांनाच राज्य परिवहन महामंडळाने ऐन दिवाळी सणाच्या कालावधीत एस्.टी.च्या प्रवासी भाड्यात २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्क्यांची शुल्कवाढ केली आहे.

खासगी गाड्यांच्या ‘एजंट’वर परिवहन खाते आणि पोलीस यांच्याकडून कोणतीच कारवाई नाही !

‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ !

राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांच्या तिकिटाचे दर दिवाळीपुरते वाढणार !

राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांच्या तिकिटाचे दर दिवाळीच्या सुट्ट्यांपुरते १० टक्क्यांनी वाढणार आहेत. ही हंगामी भाडेवाढ २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल.

श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाकडून जादा गाड्यांची सोय !

राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी १३ सप्टेंबर या दिवशी असलेल्या अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने श्री क्षेत्र गणपतीपुळे (जिल्हा रत्नागिरी) येथे जाण्यासाठी १२ सप्टेंबरच्या रात्रीपासून अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे.

मागील २ वर्षांत सोलापूर विभागातील १०० एस्.टी. गाड्या ‘स्क्रॅप’ !

आगारात प्रवासासाठी योग्य नसणार्‍या गाड्या महामंडळाच्या अनुमतीने स्क्रॅप करण्यात येतात. २ वर्षांत १०० गाड्या स्क्रॅप झाल्या असून ३० गाड्या मालवाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर विभागाच्या वतीने पुणे येथून ५० अधिक बसगाड्या सोडणार !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे येथून जे भाविक सोलापूर येथे येतात त्यांच्यासाठी ३० आणि ३१ ऑगस्ट या दिवशी ५० अधिक बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे सागर चोपदार यांची ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात तक्रार !

अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी २८ ऑगस्ट या दिवशी ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात पोलीस आणि मोटार वाहन विभाग यांकडे तक्रार केली आहे.