श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाकडून जादा गाड्यांची सोय !

राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी १३ सप्टेंबर या दिवशी असलेल्या अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने श्री क्षेत्र गणपतीपुळे (जिल्हा रत्नागिरी) येथे जाण्यासाठी १२ सप्टेंबरच्या रात्रीपासून अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे.

मागील २ वर्षांत सोलापूर विभागातील १०० एस्.टी. गाड्या ‘स्क्रॅप’ !

आगारात प्रवासासाठी योग्य नसणार्‍या गाड्या महामंडळाच्या अनुमतीने स्क्रॅप करण्यात येतात. २ वर्षांत १०० गाड्या स्क्रॅप झाल्या असून ३० गाड्या मालवाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर विभागाच्या वतीने पुणे येथून ५० अधिक बसगाड्या सोडणार !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे येथून जे भाविक सोलापूर येथे येतात त्यांच्यासाठी ३० आणि ३१ ऑगस्ट या दिवशी ५० अधिक बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे सागर चोपदार यांची ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात तक्रार !

अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी २८ ऑगस्ट या दिवशी ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात पोलीस आणि मोटार वाहन विभाग यांकडे तक्रार केली आहे.

प्रवाशांची लूटमार करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तातडीने कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

जनतेला लुटणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

तिकीट यंत्राच्या रोलचा तुटवडा असल्यामुळे ४ जणांत मिळून १ तिकीट !

कोरोनाच्या संकटातून सावरल्यानंतर संपामुळे गतप्राण झालेली एस्.टी. आता पूर्वपदावर येऊ लागली आहे; मात्र एस्.टी.च्या समस्या संपता संपेनात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागातील मुलींना बसचा पास विनामूल्य मिळण्यासाठी कन्या शाळेचा एस्.टी. प्रशासनाकडे पत्रव्यवहार !

ग्रामीण भागातील मुलींसाठी ज्ञानाची कवाडे उघडी रहावीत, यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सातारा शहरातील कन्या शाळेच्या वतीने या भागातील मुलींसाठी बसचा पास विनामूल्य मिळवून देण्याचे प्रयत्न चालू आहेत.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नाव पालटण्याचा प्रस्ताव असल्याने ‘एस्.टी.’च्या मार्गफलकांची नावेही पालटा ! – शिवसेनेचे सांगली उपशहर प्रमुख राम काळे यांचे निवेदन

राज्यशासनाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नाव अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव पालटण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या मार्गफलकांची नावे मात्र जुनीच आहेत. तरी ‘एस्.टी.’च्या मार्गफलकांची नावेही पालटा…

ज्येष्ठ नागरिकांना एस्.टी. प्रवासासाठी ओळखपत्राऐवजी आता ‘स्मार्ट कार्ड’ बंधनकारक

कोरोना संसर्गाची दुसरी लाट, तसेच महामंडळातील कर्मचार्‍यांचा संप यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ प्राप्त करून घेण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने ३०० गाड्यांचे नियोजन !

६ ते १४ जुलै या कालावधीत पंढरपूर येथे आषाढी यात्रा होत असून १० जुलै हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. आषाढी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गावांतील भाविक पंढरपूर येथे प्रवास करतात.