पाक नागरिकांना ‘आतंकवादी’ म्हटल्यावरून ‘रिपब्लिक भारत’ वाहिनीला १९ लाख ७३ सहस्र रुपयांचा दंड

पाकमधील २२ कोटी मुसलमांना आतंकवादी संबोधल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरून दखल घेतली जाते; मात्र भारतात १०० कोटी हिंदूंना वारंवार आतंकवादी संबोधले जाऊनही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणी अवाक्षरही काढत नाही !

पाद्रयांच्या वासनांधतेचा बळी !

देशात चर्च संस्थेला हिंदूंची मंदिरे आणि मुसलमानांच्या मशिदी यांच्या तुलनेत अधिक सुसंस्कृत, सभ्य आणि प्रेमाचे अन् शांततेचे पाईक समजले जात होते. हे किती तकलादू आणि ढोंगी आहे, हे सिस्टर अभया या घटनेतून उघड झाले . चर्च संस्थेचे खरे स्वरूप भारतियांच्या आता लक्षात येऊन ते त्यांच्याविषयी ताकही फुंकून पितील, अशी अपेक्षा.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ वा वर्धापनदिन सोहळा

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे ओजस्वी विचार !

धर्मावरील आघातांविषयी जागृती करणार्‍या ‘सनातन प्रभात’चा हिंदु समाज ऋणी राहील ! – अधिवक्ता विद्यानंद जोग

गेल्या २१ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ने हिंदूंच्या समस्या, मंदिर सरकारीकरण, हिंदूंवरील आघात आदी हिंदु समाजापर्यंत पोचवून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे कार्य प्रखरपणे आणि अव्याहतपणे केले. हिंदु समाज ‘सनातन प्रभात’चा ऋणी राहील.

समाजाला सत्य देण्याचा प्रयत्न पत्रकारितेतून व्हायला हवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘टी.आर्.पी.’च्या नावाखाली वाटेल, ते दाखवले जाते. ते बंद व्हायला हवे. तसे होता कामा नये. सध्या वृत्तवाहिन्यांची जी स्पर्धा चालू आहे, त्या जीवघेण्या स्पर्धेत न उतरता जे सत्य आहे, ते समाजाला देण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा हिंदुद्वेष !

हिंदूंनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला विविध सामाजिक माध्यमांद्वारे जाब विचारावा, तसेच सरकारनेही अशांना खडसवावे. असे केले, तरच हिंदु समाजाला किंवा भारताला ‘गृहीत’ धरण्याचा जो प्रकार विदेशी प्रसारमाध्यमांकडून होत आहे, तो थांबला जाईल. असे केल्याने अन्य हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी विदेशी प्रसारमाध्यमांवर वचक बसेल, हेच खरे !

विधानसभेतील अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या हक्कभंगाच्या प्रस्तावाला मुदतवाढ

सभागृहाच्या कामकाजात हस्तक्षेप झाला, तरच हक्कभंग करता येतो. शासनाला हक्कभंगाची व्याप्ती वाढवायची असल्यास वाढवता येईल; मात्र एखाद्या प्रकरणासाठी कायदा अस्तित्वात असतांना त्यासाठी हक्कभंग आणून सभागृहाचा वेळ घालवणे योग्य नाही.

कोरोनामुळे झालेल्या हानीच्या पार्श्‍वभूमीवर वृत्तपत्र उद्योगाकडून केंद्र सरकारकडे प्रोत्साहन पॅकेजची मागणी

८ मासांमध्ये या उद्योगाची सुमारे १२ सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी झाली असून वर्षाच्या शेवटी ती १६ सहस्र कोटी रुपयांपर्यंत जाईल ! यामुळे केंद्र सरकारने वृत्तपत्र उद्योगाला प्रोत्साहन पॅकेज द्यावे – इंडियन न्यूजपेपर सोसायटी

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला ‘आदर्श पत्रकार संघ’ पुरस्कार घोषित

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचे स्मारक व्हावे, यासाठी सतत २५ वर्षे पाठपुरावा करून स्मारकाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार्‍या सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाला यावर्षीचा मानाचा समजला जाणारा ‘रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेंच्या विरोधात ‘लूकआऊट नोटीस’ जारी !

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे यांच्या विरोधात पोलिसांनी ‘लूकआऊट नोटीस’ जारी केली आहे.