भारतीय मुसलमानही हिंदूच असल्याने त्यांची घरवापसी करायची आहे ! – Mohan Bhagwat
भारतात रहाणारे मुसलमानही हिंदूच आहेत, ते काही अरब देशांमधून आलेले नाहीत. त्यांचीही ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करायची आहे; पण हे काम हळूहळू होईल.
भारतात रहाणारे मुसलमानही हिंदूच आहेत, ते काही अरब देशांमधून आलेले नाहीत. त्यांचीही ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करायची आहे; पण हे काम हळूहळू होईल.
संघाच्या मागे लागण्याऐवजी थोडी शक्ती धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी वापरली असती, तर कर्नाटकात एव्हाना कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली असती !
बांगलादेशात हिंदूंवर वारंवार आक्रमणे केली जात आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून बांगलादेशातील हिंदू प्रचंड दहशतीखाली जगत आहेत. अनेक हिंदूंची भर रस्त्यात हत्या केली जात असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहेत.
विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
गेल्या अनेक वर्षांपासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा’, अशी मागणी होत आहे.
पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे. विदेशी भाषांचा वापर टाळावा. मुलांशी घरी मातृभाषेतून संभाषण करावे. मातृभाषेचा वापर वाढला पाहिजे.
विश्वाच्या कल्याणासाठीच भारताची निर्मिती झाली आहे. अर्थ आणि काम अन्य देशांमध्ये आहे; परंतु या पुरुषार्थांना साधून मोक्ष साधणारा धर्म भारतातच आहे. समाज आणि व्यक्ती यांचा एकत्रित विकास केवळ भारतीय संस्कृती साधू शकते.
आपल्या सर्वांना चालवणारे एकच तत्त्व आहे आणि ते म्हणजे धर्म ! कारण जगाकडे असा धर्मच नाही. सहस्रो वर्षे अनेक संतांनी हा धर्म जागवला. आता भारतच हा धर्म जगाला देण्याचे काम करील !
लोकांना अन्यायाविरुद्ध शांततेने आणि टप्प्याटप्प्याने लढण्याची आवश्यकता आहे. भगवान श्रीरामाने आधी संवादाने समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला; पण जेव्हा आवश्यकता पडली तेव्हा युद्धही केले.
भक्ती हीच खरी शक्ती आहे. तपश्चर्या करणार्या संतांच्या छायेत आपण उभे असल्यामुळे आपले अस्तित्व कुणीही नष्ट करू शकत नाही. धर्माच्या प्रकाशाने संपूर्ण जग उजळवणे हे आपले ध्येय आहे.