
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढील वर्षापासून प्रारंभ होणार्या शताब्दी वर्षांत आपल्याला काहीतरी मोठे करावे लागेल, असे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले. ते संघाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
प.पू. सरसंघचालक म्हणाले की,
१. प्रत्येक गावात शाखा स्थापन करावी लागेल. प्रत्येक वर्ग, प्रत्येक समाज आणि प्रत्येक धर्म यांचे लोक शाखेशी जोडले गेले पाहिजेत. वर्ष २०२५ पर्यंत देशात असे एकही गाव उरणार नाही जिथे रा.स्व. संघ अस्तित्वात नाही. भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संघाला प्रत्येक गावात पोचावे लागेल. आपली भाषा आणि वागणे, यांवर संयम राखून आपण सर्वांपर्यंत पोचले पाहिजे.
२. देशावर जेव्हा जेव्हा कोणतेही संकट आले, तेव्हा स्वयंसेवकांनी धैर्याने त्याचा सामना केला; परंतु काही लोक संघाची नकारात्मक प्रतिमा समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा