इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलन यांमुळे आतापर्यंत १४० हून अधिक जणांचा मृत्यू

येथे सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने बेपत्ता लोकांच्या शोधामध्ये अडथळे येत आहेत. अदोनारा बेटावरील पूर्व फ्लोरेस जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मनुष्यहानी झाली आहे. येथे झालेल्या भूस्खलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला.

आपत्काळाच्या दृष्टीने पुढील सिद्धताही करा !

गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), अपार्टमेंट आदी ठिकाणी रहाणार्‍यांनी एकत्रितपणे पुढील सोयी करून घ्या, उदा. यात ‘बायो-गॅस’ संयंत्र उभारणे, विहीर खणणे, सौरऊर्जेची सोय करणे इत्यादी

उत्तराखंडमध्ये तुटलेल्या हिमकड्याच्या ढिगार्‍यामुळे ऋषिगंगाचा प्रवाह थांबून निर्माण झालेला तलाव फुटला, तर पुन्हा प्रलय येण्याची शक्यता !

काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या चमोलीतील जोशी मठ येथे हिमकडा कोसळून आलेल्या प्रलयानंतर पुन्हा अशी स्थिती येेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे हिमकडा तुटल्यानंतर जमा झालेल्या ढिगार्‍यामुळे ऋषिगंगा नदीचा वरचा प्रवाह थांबला आहे.

उत्तराखंडमध्ये जोशी मठाजवळ हिमकडा कोसळल्याने पूरसदृश्य स्थिती : १५० हून अधिक जण बेपत्ता

भारतात आपत्काळाला प्रारंभ झाला आहे आणि तो प्रतिदिन हळूहळू त्याचे रौद्र रूप दाखवत आहे. जोशी मठातील हिमकडा अचानक कोसळून पूरसदृश्य स्थिती निर्माण होणे, हा याच आपत्काळातील एक प्रसंग आहे.

पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी गुरुवायूर मंदिराकडून घेतलेले १० कोटी रुपये परत द्या !

केवळ पैसेच परत घेऊ नयेत, तर असा निर्णय घेणार्‍यांना न्यायालयाने दंड ठोठावला पाहिजे. जर यापूर्वीही अशा प्रकारे मंदिराचे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले गेले असतील, तर तेही परत घेण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !

हिंदूंच्या मंदिरांचा निधी धर्मासाठी खर्च व्हावा ! 

पूरग्रस्तांच्या साहाय्य निधीसाठी केरळच्या गुरुवायूर मंदिराकडून प्राप्त झालेले १० कोटी रुपये मंदिराला परत करण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.

मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !

शहरांमधील बेसुमार गर्दी, स्वच्छतेचा अभाव, वाढते प्रदूषण, रज-तम यांचे अधिक प्राबल्य आदींमुळे तेथील नागरिक भीती आणि असुरक्षितता यांच्या सावटाखाली वावरतांना दिसत आहेत. युद्धजन्य परिस्थिती, दंगली, त्सुनामी, रोगराई आदी आपत्तींच्या वेळी ही शहरे गावापेक्षा अधिक संकटात असू शकतात. त्यामुळे तेथे रहाणे धोक्याचे ठरू शकते.