
पुणे, २७ जुलै – अतीवृष्टीमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हाहाःकार उडाला आहे. पुराने अनेकांचे जीव घेतले, अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. चिपळूण येथील परिस्थितीही भयावह झाली होती; मात्र आता चिपळूण शहरातील पूर ओसरत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांकडून साहाय्य कार्याला पुन्हा एकदा प्रारंभ झाला आहे. अशा वेळी साहाय्याचे अनेक हात पुढे येत आहेत. ब्राह्मण महासंघही या कार्यात सहभागी होत आहे. ३०० कुटुंबांना एका मासाचे किराणा किट देण्यात येईल. त्यासाठी ५०० किलो गहू, ३०० किलो तांदूळ, २०० किलो पीठ, तेल, तूप नवीन साड्या, ‘ड्रेस’, २०० बाटल्या फिनेल, पाणी अशा १७५ वस्तूंचे मिळून ४ लाख रुपयांचे साहित्य ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुणे येथून विधिवत् पूजा करून वेगळ्या ट्रकने चिपळूणसाठी लवकरच रवाना होईल.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !