पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील ११३ जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता, तर १ लाख ३५ सहस्र ३१३ नागरिकांचे स्थलांतर !

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी २ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित !

आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या माध्यमातून पूरग्रस्तांना साहाय्य !

अंकली, जुनी धामणी, हरिपूर येथील नागरिकांसाठी मालू हायस्कूल, विलिंग्डन कॉलेज याठिकाणी स्थलांतरीत करून ३०० हून अधिक पूरग्रस्तांसाठी भोजनाची सोय करण्यात आली आहे.

नांदेड येथील ८० पैकी २४ महसूल मंडळांत अतीवृष्टी झाल्याने नदी-नाले यांना पूर !

पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरील पुलावरून पाणी वहात असल्याने काही काळासाठी संपर्क तुटला होता. पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे.

कोकणात अतिवृष्टीची शक्यता, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

कोकणामध्ये पुढील २ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

चिपळूणचा पूर ३६ घंट्यांनंतर ओसरला : १२ जणांचा मृत्यू

व्यापारी आणि नागरिक यांची कोट्यवधी रुपयांची हानी  

सांगली-कोल्हापुरात पाऊस थांबल्याने काहीसा दिलासा : पुराचे सावट कायम

कोल्हापूर अद्यापही संपर्कहीन
सहस्रो एकर शेतीची हानी
४० सहस्रांहून अधिक लोकांचे स्थलांतर

कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती : कोल्हापूर-गगनबावडा, रत्नागिरी महामार्गासह अनेक रस्ते बंद !

कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. २२ जुलैला सकाळी १० वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३७ फूट २ इंच इतकी झाली असून २३ जुलैला ही पातळी ४३ फूट गाठण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.

वर्ष २०३० मध्ये चंद्राच्या कक्षेत पालट होऊन पृथ्वीवर पूरस्थिती निर्माण होईल ! – नासा

जागतिक हवामान पालटामुळे पृथ्वीवरील वातावरणावर परिणाम होत आहे. अंटार्टिकामधील बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍यालगत शहरांमधील पाण्याची पातळी वाढत आहे.

उत्तर कोरियामध्ये अन्नटंचाई निर्माण होण्याची शक्यता

नागरिकांना सतर्क रहाण्याचा हुकूमशाह किम जोंग उन यांचा आदेश !

पूर संरक्षक भिंतीचा निधी जलसंपदा अधिकार्‍यांनी घाईने अन्यत्र वळवू नये ! – ग्रामस्थांची मागणी !

प्रतिवर्षी कराड आणि पाटण तालुक्यातील ८१ गावे पूरग्रस्त होतात. तरीही अद्याप तेथे कोणतीही उपाययोजना केली गेलेली नाही.