श्री महालक्ष्मीदेवी, जोतिबादेवा लढण्याची उमेद वाढवून दे !

कवितेद्वारे पूरग्रस्तांची साद

कोल्हापुरातील एका फलकावर लिहिलेला प्रेरक लिखाण

कोल्हापूर, २७ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर नेहमीच आगळ्या-वेगळ्या गोष्टींसाठी ओळखले जाते. मातीशी रांगडेपण जपावे ते कोल्हापूरनेच. पुरात सर्वस्व वाहून गेले, तरी येथील लोकांमध्ये परत उभे रहाण्याची जिद्द आहे. अशाच एका फलकावर लिहिलेल्या कवितेतून ‘श्री महालक्ष्मीदेवी, जोतिबा देवा सगळ काढून घे; मात्र लढण्याची उमेद वाढवून दे !’, अशी भावनिक साद घालण्यात आली आहे. हा फलक सध्या कोल्हापूरकरांना महापुराच्या विरोधात लढण्याची एक नवी उर्मी देत आहे !