सिंधुदुर्ग : झरेबांबर ग्रामस्थांचे ‘जलसमाधी’ आंदोलन तूर्तास स्थगित !

धरणांचा लाभ मिळण्यासाठी शेतकर्‍यांना आंदोलन करण्यास भाग पाडणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, अन्यथा विविध प्रकल्प हे ठेकेदार अन् अधिकारी यांच्या लाभासाठीच असतात, असेच जनतेला वाटेल !

शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांवर गुन्हे नोंद करा ! – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना वेळेत खते आणि बियाणे उपलब्ध होतील, याविषयी कृषी विभागाने दक्ष रहावे. सेंद्रीय खतांच्या नावाने माती विकणार्‍यांवर, तसेच बी-बियाण्यांमध्ये शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांवर गुन्हे नोंद करावेत

अवेळी पावसामुळे अनेकांचा संसार उघड्यावर; शेतीपिकांना मोठा फटका !

बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती आणि बीड या जिल्‍ह्यांत वादळी वार्‍यासह अवेळी पावसाने उपस्‍थिती लावली आहे. यामध्‍ये शेती पिकांसह घरांचीही मोठी हानी झाली आहे. अनेकांचा संसार या वादळी पावसामुळे उघड्यावर पडला आहे.

सोलापूर जिल्ह्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने शेतीपिकांची हानी !

सलग २७ आणि २८ एप्रिल या दिवशी वादळी वार्‍यासह झालेल्या अवेळी पावसामुळे विजेचे खांब अन् अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतीतील पिकांची मोठी हानी झाली.

यवतमाळ जिल्ह्यात अवेळी पडलेल्या पावसाने मोठी हानी !

जिल्ह्यात ३ दिवसांपासून चालू असलेल्या वादळी वार्‍यासमवेत गारपीट आणि पाऊस यांमुळे उन्हाळी शेतपिकांची मोठी  हानी झाली आहे. अंदाजे ३ सहस्र हेक्टरवरील उन्हाळी पिके नष्ट झाली आहेत.

अवेळी पडलेल्या पावसाने लातूर जिल्ह्यात टोमॅटो, द्राक्षे आणि फळबागा यांची मोठी हानी !

काही ठराविक अंतरानंतर सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. बाजारात शेतमालाला उठाव नाही आणि त्यातच होणारी हानी शेतकऱ्याची आर्थिक घडी तोडणारी आहे.

रत्नागिरी-८ बी ही भाताची नवीन जात विकसीत : महाराष्ट्रासह ६ राज्यांत मागणी

रत्नागिरी- ८ या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे १३५-१४० दिवसांत तयार होणारी असून, मध्यम बारीक दाणा आहे. चवीला उत्तम आहे. कापणी वेळेवर केली, तर अखंड तांदूळ अधिक होऊन तांदूळतुटीचे प्रमाण खूपच अल्प येते.

केवळ जंगलतोडीमुळे महापूर येतो असे म्हणणे चुकीचे ! – रत्नागिरी जिल्हा लाकूड व्यापारी संघटना  

जिल्ह्यातील बहुतांशी जंगल खासगी शेतकर्‍यांच्या मालकीचे आहे. शेतकरी महसूल आणि वन विभागाकडून जंगलतोडीची रितसर अनुमती घेतात आणि त्यानंतर जंगल तोडले जाते.

अवेळी पावसामुळे राज्यात शेती आणि फळपिके यांची मोठ्या प्रमाणात हानी !

राज्यात सलग दुसर्‍या दिवशी अवेळी पावसामुळे शेतीपिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, सांगली, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पाऊस पडला. अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडल्यामुळे घरांचीही हानी झाली.

मराठवाड्यात ८४ कोटी ७५ लाख रुपयांची हानी !

संपूर्ण मराठवाड्यात आतापर्यंत ८४ कोटी ७५ लाख रुपयांच्या हानीभरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत.