औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधा ! – भाजपचे नेते आफताब आडवाणी

आज जे काही होत आहे, ते सर्व औरंगजेबामुळे होत आहे. औरंगजेबाने लाखो हिंदूंची हत्या केली आणि लुटमार केली. त्यामुळे महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे असणार्‍या औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधण्यात आले पाहिजे

धार्मिक स्थळाचे स्वरूप ठरवण्याच्या प्रयत्नास प्रतिबंध करता येत नाही !

मंदिरांच्या ठिकाणी मशिदी बांधल्याच्या वक्तव्यांना विरोध करण्याचा प्रयत्न मुसलमान पक्षाकडून केला जात आहे, त्याला यामुळे चाप बसला आहे ! हिंदूंनी आता त्या सहस्रो धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणाची मागणी केली पाहिजे जी मूळची हिंदूंची आहेत !

हिंदूंनी ज्ञानवापी कह्यात घ्यावी ! – तस्लिमा नसरीन

देश-विदेशातील किती मुसलमान सत्य इतिहास मान्य करून असे सांगण्याचे धाडस करत आहेत ? या प्रश्नाचे ‘एकही नाही’, असेच उत्तर मिळते ! याचाच अर्थ धर्मनिरपेक्षता आणि अन्य धर्मांचा आदर केवळ हिंदूंनी करायचा अन् अन्यांनी हिंदूंवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर आघात करायचे असाच होतो, हे हिंदू आतातरी लक्षात घेतील का ?

दुचाकी चालवतांना ‘हेल्मेट’ घातल्यावरही होऊ शकतो दंड !

या जोडीलाच वाहन ‘ओव्हरलोडेड’, म्हणजे अतिरिक्त भार वाहून नेत असेल, तर चालकाला २० सहस्र रुपये एवढा दंडही होऊ शकतो. यासह चालकाला प्रति टन २ सहस्र रुपयांचा अतिरिक्त दंडही भरावा लागू शकतो.

ज्ञानवापी मशीद नसून मंदिर आहे !

औरंगजेबाने काशी विश्‍वेश्‍वर मंदिराचा काही भाग पाडून तेथे ज्ञानवापी मशीद उभी केली; मात्र ते तेथील धार्मिक स्वरूप पालटू शकले नाहीत; कारण तेथे शृंगारगौरी, भगवान श्री गणेश आणि अन्य हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आजही आहेत. त्यामुळे ही जागा मशीद नाही, अशी माहिती हिंदु पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.

देहलीतील ‘औरंगजेब लेन’ला ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ नाव देण्याची भाजपची मागणी

नवी देहली येथील ‘औरंगजेब लेन’ लिहिलेल्या फलकावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ असे भित्तीपत्रक चिकटवले आहे. ‘औरंगजेब हा देशावरचा काळा डाग आहे’, असे विधान देहली भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष वासू रखड यांनी केले आहे.

इस्रो आणि अंतराळ विभाग यांच्याकडून गेल्या २ वर्षांत ५५ हून अधिक ‘स्टार्टअप’ची नोंदणी !

इस्रोला खासगी लोकांसाठी मोकळीक दिल्यानंतर ही नोंदणी झाली आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहांना अंतराळात पाठवण्याची संधी देण्याची योजना आहे’, अशी माहिती डॉ. सिंह यांनी दिली.

हिंदुद्वेषी पत्रकार आरफा खानुम शेरवानी यांच्याकडून भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणारे व्यंगचित्र प्रसारित

केंद्र सरकारने हिंदूच्या देवतांचा अवमान करणार्‍यांवर पोलिसांकडून स्वतःहून कारवाई करण्याचा आणि कठोर शिक्षा करण्याचा कायदा बनवून अशा घटना रोखाव्यात, असेच हिंदूंना वाटते !

देहलीच्या उपराज्यपालांचे त्यागपत्र

देहलीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी १८ मे या दिवशी त्यांच्या पदाचे अचानक त्यागपत्र दिले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी त्यागपत्र पाठवले

भारतात वर्ष २०१९ मध्ये वायू प्रदूषणामुळे १६ लाख ७० सहस्र लोकांचा मृत्यू ! – ‘लॅन्सेट’ नियतकालिक

लॅन्सेट नियतकालिकाचे याआधीचे अहवालही वादग्रस्त होते. ‘भारताशी संबंधित ही आकडेवारीही फुगवून तर सांगितली नाही ना ?’, याची सरकारने चौकशी करून याचे खंडण करणे आवश्यक !