ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! –  डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री

  • महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन

  • विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी निकष शिथील ! 

डॉ. पंकज भोयर, शिक्षण राज्यमंत्री

मुंबई, २७ जून (वार्ता.) – ग्रामीण आणि दुर्गम भागांतील इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कोंडी फुटणार आहे. या भागांतील दोन्ही वर्गांची एकत्रित पटसंख्या २० किंवा त्याहून अधिक असल्यास तेथे ३ शिक्षक अनुज्ञेय करण्याची मोठी सवलत शासनाने दिली आहे, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी २५ जून या दिवशी विधान परिषदेत दिली. आमदार किरण सरनाईक आणि इतर सदस्य यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

पूर्वीच्या नियमानुसार एकत्रित पटसंख्या ४० असणे बंधनकारक होते; मात्र ग्रामीण भागातील मुलींना दुसर्‍या गावी जावे लागू नये, या सामाजिक जाणिवेतून हा निकष शिथिल करण्यात आला आहे, तसेच ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून गुणवत्ताधारक शिक्षकांची पारदर्शक भरती चालू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाला उच्च न्यायालयानेही वैध ठरवले आहे.