भयावर मात करून सध्याच्या भयावह संकटाला सामोरे जाणे ही आपल्या गुरुभक्तीची कसोटी ! – पू. प्रमोद केणे, दत्त संप्रदाय
सध्याचा काळ हा अत्यंत कठीण, भयावह आणि कोरानारूपी भस्मासुराने व्याप्त आहे. चहूबाजूला मृत्यूचे थैमान चालू आहे. संपूर्ण विश्व या महामारीमुळे त्रस्त आहे. तरीही भयभीत होऊ नका. धीर सोडू नका. ईश्वरावरील असीम निष्ठेची ही कसोटी आहे.