
कळंबोली (पनवेल) – सध्याचा काळ हा अत्यंत कठीण, भयावह आणि कोरोनारूपी भस्मासुराने व्याप्त आहे. चहूबाजूला मृत्यूचे थैमान चालू आहे. संपूर्ण विश्व या महामारीमुळे त्रस्त आहे. तरीही भयभीत होऊ नका. धीर सोडू नका. ईश्वरावरील असीम निष्ठेची ही कसोटी आहे. यातून तावून सुलाखून आपल्याला बाहेर पडायचे आहे. काही बंधने स्वतःच स्वतःवर लादून घ्यावयाची आहेत. कोरोनासाठीच्या निर्बंधांचे पालन करायचे आहे. दिवसातून किमान दोन वेळा हळदीच्या पाण्याची वाफ घेण्यासह हळद आणि ओवायुक्त गरम पाण्याचे सेवन करणे आपल्यासाठी हितकारक ठरेल. भयावर मात करून संकटाला सामोरे जायचे आहे, ही आपल्या गुरुभक्तीची कसोटी आहे, असे मार्गदर्शन दत्त संप्रदायाचे पू. प्रमोद केणे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. उमेश किचंबरे यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज