कायदे सिद्ध करण्यासाठी अनेक देशांनी मनुस्मृतीचा संदर्भ घेतला ! – भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि कीर्तनकार, मुंबई, महाराष्ट्र
धर्म समजण्यासाठी भगवंताने वेदांची निर्मिती केली. सोने जुने झाले; म्हणून त्याचे मूल्य न्यून होत नाही. वेदांमधील ज्ञान शाश्वत आहे. हे सांगणारा मनु हा पृथ्वीवरील पहिला व्यक्ती होता. मनु हा राजा होता. जेव्हा पाश्चात्यांना कपडे परिधान करण्याचेही ज्ञान नव्हते, तेव्हा मनु याने ‘मनुस्मृती’ लिहिली.