सातारा येथे शुद्ध पाण्यासाठी ‘चक्का जाम आंदोलन’ !
दीड मासापासून शहरातील पश्चिम भागात दूषित पाण्याचा पुरवठा नगरपालिकेकडून केला जात आहे. वारंवार सांगूनही शुद्ध पाणीपुरवठा केला जात नाही. याच्या निषेधार्थ ढोणे कॉलनी, मनामती चौक, रामाचा गोट परिसरातील नागरिकांनी मोती चौक येथे ‘चक्का जाम आंदोलन’ केले.