साधकांनो, प्रतिमा जपणे या अहंच्या पैलूमुळे स्वतःच्या चुका लपवून भगवंताच्या चरणांपासून दूर जाण्यापेक्षा प्रामाणिकपणे चुका स्वीकारून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करा !
ईश्वराचे आपल्या प्रत्येक कृतीकडे लक्ष असते. जो पापी स्वत:चे पाप सार्या विश्वाला ओरडून सांगतो, तोच महात्मा होण्याच्या पात्रतेचा असतो, हा दृष्टीकोन ठेवून साधकांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.