महाभारत युद्धाला प्रारंभ !
मार्गशीर्ष शुक्ल द्वादशीला कौरव-पांडव यांमधील महाभारत युद्ध चालू झाले. भीष्मार्जुन, भीम-दुर्योधन, सात्यकी- कृतकर्मा, युधिष्ठिर-शल्य यांची द्वंद्वयुद्धे चालू झाली. संग्रामांत पहिल्याच दिवशी सहस्रो हत्ती, घोडे आणि पायदळे मरून रणमैदान रक्तामांसाने माखून गेले.