
सातारा, ५ मे (वार्ता.) – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रहित केले आहे. या निर्णयामुळे अन्यायग्रस्त मराठा समाजावर पुन्हा अन्यायच झाला आहे. आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन मूक मोर्चे काढून मराठा समाजाने अभूतपूर्व लढा उभा केला होता; मात्र सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. त्यामुळे मराठा समाजाच्या सर्वच प्रयत्नांवर पाणी पडले असून मराठा आरक्षण रहित केल्याचा निर्णय हा समाजासाठी दुर्दैवी आहे. आरक्षणप्रश्नी एकी राहिली नाही. याचे गंभीर परिणाम आता सर्व समाजाला भोगावे लागत आहेत, असे मत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षण रहित केल्याने सातारा येथे शिवतीर्थावर निदर्शने
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रहित केल्याने राजधानी सातारा येथे मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने कोरोनाचे नियम पाळत निदर्शने करण्यात आली. दळणवळण बंदी उठवल्यानंतर एकत्र येऊन पुढील लढ्याची दिशा ठरवण्यात येईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्च्याच्या जिल्हा पदाधिकार्यांनी दिली आहे.
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !