विशाळगडावरील अतिक्रमण तातडीने हटवण्यासमवेत राज्यशासनाने विशाळगडाच्या संदर्भात विशेष आराखडा आखणे अत्यावश्यक !

याच मागणीचे पत्र श्री. राजेश क्षीरसागर यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना लिहिले आहे.

नातेवाइकांच्या हातात रेमडेसिविरची चिठ्ठी दिसली, तर डॉक्टरांवर कारवाई ! – धनराज पांडे, उपायुक्त

कोणत्याही डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाइकांना चिठ्ठी लिहून हे औषध आणायला सांगू नये. १४ एप्रिलपासून कोणत्याही रुग्णाचा नातेवाईक रेमडेसिविरची चिठ्ठी घेऊन फिरतांना दिसल्यास त्याची चौकशी होईल.

गुढीपाडव्यानिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये केलेल्या ‘ऑनलाईन’ विहंगम धर्मप्रसाराच्या कार्याला जिज्ञासूंचा उदंड प्रतिसाद !

गुढीपाडव्याचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व काय आहे ? धर्मशास्त्रानुसार आणि सध्याच्या आपत्काळात तो कसा साजरा करावा, हे लोकांना अवगत व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ माध्यमातून जिल्ह्यामध्ये विहंगम धर्मप्रसार चालू होता.

छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारे मुंबई आणि ठाणे येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मुंबईतील दहिसर आणि शीव येथे, तर ठाणे येथील वामनराव ओक रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रमझानच्या काळात सामूहिक नमाजपठणाची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली

‘नागरिकांचे आरोग्य हेच केंद्रस्थानी आहे’, असे नमूद करत सामूहिक नमाजपठणाच्या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली.

मुंबईतील रेल्वेच्या डब्यांचा वापर कोरोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी होणार !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत रेल्वेच्या डब्यांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मध्य आणि पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने कामाला प्रारंभ केला आहे.  

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बरी होण्यासाठी त्यांची मुलगी रमझानच्या काळात रोजे (उपवास) ठेवणार !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अन्य धर्मियांच्या धार्मिक कृती करून स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात; मात्र अन्य धर्मीय कधीही हिंदूंच्या धार्मिक कृतींचे पालन करून ते ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे कधीही दाखवत नाहीत.

केंद्र सरकारकडून सी.बी.एस्.ई.च्या दहावीच्या परीक्षा रहित, तर बारावीच्या स्थगित

केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर  सी.बी.एस्.ई.च्या दहावीच्या परीक्षा रहित केल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी पाद्य्रासह चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद

अशा प्रकरणात चुकून एखाद्या पुजार्‍याचे नाव आले असते, तर एव्हाना प्रसारमाध्यमांनी जगभर बोभाटा केला असता. आता ते मूळ गिळून गप्प आहेत. यावरून भारतातील बहुतांश प्रसारमध्यमे ख्रिस्तीधार्जिणी आहेत, हेच स्पष्ट होते !

दोन जणांना चकमकीत मारण्याची सचिन वाझे यांची योजना होती ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

अँटिलिया आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे दोन जणांना चकमकीत मारणार होते, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएन्च्या) सूत्रांनी दिली.