कर्नाटकच्या गोहत्याबंदी कायद्यामुळे कर्नाटकमधून गोव्यात येणार्‍या गोमांसाच्या अनधिकृत वाहतुकीला आळा बसेल ! – हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान

कर्नाटकच्या या गोहत्याबंदी कायद्यामुळे गोव्यात कर्नाटकमधून येणार्‍या गोमांसाच्या अनधिकृत वाहतुकीला आळा बसणार आहे, असे मत ‘गोवंश रक्षा अभियान’चे श्री. हनुमंत परब यांनी व्यक्त केले आहे.

रूपी अधिकोषातील खातेदारांची १ सहस्र १४६ कोटी रुपये परत मिळावेत यासाठी उच्च न्यायालयात धाव !

ठेवीदारांच्या आर्थिक अडचणींचा विचार करता रूपी अधिकोषाच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेतील १ सहस्र १४६ कोटी रुपये परत मिळावेत म्हणून गुंतवणूकदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सांगवे येथील रास्त भाव धान्य दुकानातील धान्याचा काळा बाजार स्थानिकांच्या सतर्कतेमुळे उघड !

रास्त भाव धान्य दुकानातील धान्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचा डाव स्थानिकांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. या प्रकरणी दुकानाची तपासणी केली असता साठ्यात तफावत आढळून आल्याने पुरवठा निरीक्षक नितीन शंकरदास डाके यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवा !

तहसीलदारांच्या वतीने वसंत उगले आणि पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी निवेदन स्वीकारले.

कुटुंब नियोजनाचे निर्बंध लादण्यात आलेले नाहीत ! – केंद्र सरकार

देशात कुटुंब नियोजन करणे स्वेच्छिक आहे. त्यामुळे स्वतःचे कुटुंब किती मोठे असावे, याचा निर्णय दांपत्याकडून घेतला जातो. त्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादण्यात आलेले नाहीत, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

रूपी बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत !

रूपी बँकेचे प्रशासक गुंतवणूकदारांना विश्‍वासात न घेता परस्पर व्यवहार करीत असल्याचा आरोप ‘ग्रुप ऑफ पीपल वर्क’ या संघटनेने पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर रूपी बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत आहे.

सावंतवाडी शहरात अज्ञातांनी केलेल्या प्राणघातक आक्रमणात टेम्पोचालक गंभीर घायाळ

कोल्हापूर येथून सावंतवाडीला साहित्य घेऊन आलेल्या टेम्पोचालकावर शहरातील जिमखाना मैदानाजवळ दोघा अज्ञातांनी चाकूने आक्रमण करून त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेत टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (हाडोळी, कोल्हापूर) हे गंभीर घायाळ झाले.

सॅमसंग भारतात ४ सहस्र ८२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

‘सॅमसंग’ या मोठ्या विदेशी आस्थापनाने चीनमधून त्याचे कारखाने बंद करण्याचा प्रयत्न चालवला असून आता भारतातील उत्तरप्रदेशच्या नोएडामध्ये कारखाना चालू करणार आहे. उत्तरप्रदेशच्या मंत्रीमंडळाने सॅमसंगच्या ‘ओएल्ईडी डिस्प्ले युनिट’ उभारण्याच्या प्रस्तावाला संमती दिली आहे.

निर्यातक्षम आंबा बागांची ‘हॉर्टीनेट’द्वारे ‘मँगोनेट’ या संगणकीय प्रणालीवर नोंदणी करा ! – विभागीय कृषी सह संचालकांचे आवाहन

निर्यातक्षम आंबा बागांची ‘हॉर्टीनेट’द्वारे मँगोनेट या संगणकीय प्रणालीवर नोंदणी ३१ मार्च २०२१ पर्यंत करता येणार असून संबंधित आंबा बागायतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.

श्री महालक्ष्मीदेवी, जोतिबासह मुख्य मंदिरांतील दर्शनाची वेळ वाढवली

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी, श्री जोतिबादेव, श्री दत्त भिक्षालिंग स्थानासह सर्व मंदिरांतील दर्शन वेळेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. ११ डिसेंबरपासून त्याची कार्यवाही चालू झाली आहे.