गोवा आणि आसपासच्या परिसरातील वाघांच्या संख्येत घट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच वर्ष २०२२ ची व्याघ्रगणनेची संख्या प्रसिद्ध केली आहे. यामधून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

स्वयंपूर्ण गोवा अर्थसंकल्पाच्या कार्यवाहीचा कृतीआराखडा ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सर्व सचिवांसमवेत बैठक

अर्थसंकल्पाच्या काटेकोर कार्यवाहीचा निर्णय घेऊन आर्थिक आणि प्रशासकीय दृष्टीने अंदाजपत्रकात घोषित केलेल्या योजना कोणत्या मासापासून चालू होणार ? याचा तपशील देण्याच्या सूचना सचिवांना दिल्या आहेत.

गोवा : आसगाव येथे बनावट विक्री कराराद्वारे १२ मालमत्तांची विक्री केल्याचे उघड

या १२ मालमत्ता आसगाव आणि पर्रा या गावांतील आहेत. बनावट सिद्ध केलेल्या करारामध्ये वारसाहक्क असलेले मिंगेल आर्कांजिओ डिसोझा एप्रिल १९५१ मध्ये मरण पावले. त्यानंतर ७ महिन्यांनी ते हयात असल्याचे दाखवण्यात आले !

‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र नव्हे, तर शास्त्र किंबहुना शस्त्र आहे ! – प्राचार्य डॉ. मनोज कामत

‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून एक दैवी आणि आध्यात्मिक शक्ती घरात प्रवेश करतांनाची अनुभूती प्रत्येक वाचकाला येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रज्वलित केलेला हा नंदादीप आहे. धर्मतेज आणि क्षात्रतेज या दोन्हीचे सार यात सामावलेले आहे !

‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात माजी संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते पूजन

यानिमित्त श्री गणपति, श्री सरस्वती आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्थापक-संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली अन् पुढील कार्यही असेच अविरत चालू रहाण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

वनक्षेत्र वाढ आणि जैवविविधता टिकवणे यांसाठी गोवा सरकार बांधील ! – मुख्यमंत्री

वर्ष २०१९ च्या तुलनेत वर्ष २०२१ च्या भारत सरकारच्या वन अहवालानुसार गोव्यातील वनक्षेत्रामध्ये ७ चौरस किलोमीटरची वाढ ! वनीकरण निधी व्यवस्थापन योजनेची कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याने वनक्षेत्रात वाढ होत आहे.

गोवा : अडीच मासांत समुद्रकिनारी भागात रात्री ध्वनीप्रदूषण होत असल्याच्या प्रतिदिन सरासरी १०० तक्रारी

एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी करूनही पोलीस आणि प्रशासन अडीच मासांत ध्वनीप्रदूषण रोखू न शकणे ही त्यांची अकार्यक्षमता म्हणायची ? हतबलता समजायची कि यात भ्रष्टाचार आहे, असे समजायचे ?

ऋषिमुनींनी दिलेली वैश्विक सर्वसमावेशक सांस्कृतिक विचारधारा, हीच भारतीयता ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

भारताविषयी कुणाला भीती वाटत नाही; कारण आम्ही कितीही शक्तीवान झालो, तरी आमची संस्कृती आम्हाला दुसर्‍यांवर अतिक्रमण करण्याची शिकवण देत नाही.

गोवा : खोतीगाव, गावडोंगरी परिसरातील डोंगरांना आग !

गेल्या मासात म्हादई अभयारण्याला लागलेली आग थांबवण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले होते. त्यानंतर आता खोतीगाव आणि गावडोंगरी परिसरातील डोंगरांनाही आग लागली. अग्नीशमन दलाच्या साहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

गोवा : आता शैक्षणिक वर्षाच्या शेवटी पाठ्यपुस्तके शाळेतच जमा होणार !

पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने घेण्यात आलेला हा चांगला निर्णय आहे; मात्र आता शाळांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारी जुनी पाठ्यपुस्तके नव्या वर्षातील मुलांपर्यंत पोचण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक !