Nerul Police Iftar Party : हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर पोलिसांनी आयोजित केलेली इफ्तार मेजवानी रहित !

  • नेरूळ पोलीस ठाणे आणि मरकज-ए-फलाह यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्तार मेजवानीचे आयोजन

  • विश्‍व हिंदु परिषदेकडून पोलिसांना निषेध पत्र !

मुंबई – नेरूळ पोलीस ठाणे आणि ‘मरकज-ए-फलाह’ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ मार्च या दिवशी नेरूळ पूर्वमध्ये इफ्तार मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. याविषयीच्या कार्यक्रमाची पत्रिका ‘मरकज-ए-फलाह’ या धार्मिक संघटनेच्या नावे आणि नेरूळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्‍याची स्वाक्षरी अन् ‘लोगो’ यांच्यासहित प्रसारित झाली होती; पण कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्याने कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत मेजवानीचा कार्यक्रम रहित करण्यात आला. (सतर्कता बाळगून तत्परतेने कृती करणार्‍या नेरूळच्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! – संपादक)

१. पोलिसांनी कार्यक्रम आयोजित केल्याचे लक्षात आल्यावर विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नेरूळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यांनी नागपूर येथे झालेली दंगल आणि पोलिसांवर करण्यात आलेले प्राणघातक आक्रमण या पार्श्‍वभूमीवर कार्यक्रमाला विरोध केला. याविषयीचे पत्रही परिषदेच्या वतीने नेरूळ पोलिसांना देण्यात आले. याची नोंद घेत इफ्तार मेजवानी रहित करण्यात आली.

२. एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवाडी यांच्याशी संपर्क साधला; मात्र त्यांनी याविषयी बोलणे टाळले.

३. मेजवानीच्या पत्रकामध्ये वापरण्यात आलेला ‘लोगो’ बेकायदेशीर होता, अशी माहिती अधिवक्ता आकाश जगताप यांनी दिली. (या प्रकरणी संबंधितांवर कारवाई होणार का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • इफ्तार मेजवानी आयोजित करण्यासाठी पुढाकार घेणारे पोलीस हिंदूंचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना कधी दिसत नाहीत ! असे पोलीस अन्य धर्मियांची पाठराखण करत असल्याचा विचार हिंदूंच्या मनात आल्यास चुकले कुठे ?
  • मुळात अशा मेजवान्यांच्या माध्यमातून पाहुण्यांच्या दाढ्या कुरवाळणारे पोलीस दंगलींच्या वेळी या पाहुण्यांच्याच हातून मार खातात. नागपूर दंगल परवाचीच आहे. तरी अशा प्रकारे गांधीगिरी करण्यातून नेरूळ पोलीस ठाणे आत्मघातच करत आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?
  • सरकारी कार्यालयात सत्यनारायणाची पूजा घातल्यावरून धर्मनिरपेक्ष लोकशाहीची हत्या होत असल्याची ओरड करणारे आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ?