रांची (झारखंड) – बांगलादेशातील काही आतंकवादी झारखंडमध्ये घुसले होते. त्यांनी राज्यातील पाकूरमध्ये काही मुसलमानांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते परत गेले. हा प्रकार एका मोठ्या कटाचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. झारखंडमधील आतंकवादविरोधी पथकाला ही माहिती मिळाली आहे. यामुळे राज्यात अतीदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे.
Terrorists from Bangladesh train local Muslims in Jharkhand
It is shameful for Indian intelligence agencies that terrorists illegally enter India train local Muslims and then and go back !
This shows how dangerous the problem of Bangladesh has become, not only for the Hindus of… pic.twitter.com/iE6g1dmBne
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 18, 2025
१. बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकार पडल्यानंतर बंदी घातलेल्या संघटना भारतविरोधी कारवाया करण्याचा कट रचत आहेत, असे म्हटले जाते. या कटाच्या अंतर्गत बांगलादेशी आतंकवादी भारतविरोधी कारवाया करण्यासाठी भारतात घुसले आहेत.
२. ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशा’चा (जे.एम्.बी.चा) आतंकवादी अब्दुल मम्मन बांगलादेशातून सीमा ओलांडून आला होता. तो मुर्शिदाबादमधील धुलियान मार्गे पाकूरला पोचला.
३. ६ जानेवारी या दिवशी तो बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून पाकूरला पोचला. तेथील दुबराजपूर येथील ‘इस्लामिक दावत केंद्रा’त जहा-इंडिया आणि जे.एम्.बी. यांच्या आतंकवाद्यांमध्ये एक बैठक झाली. यामध्ये जे.एम्.बी.चा आतंकवादी अब्दुल मम्मन देखील सहभागी झाला.
४. पाकूर येथे प्रशिक्षण घेतलेल्या सर्व १५ जणांची नावे मिळाली आहेत. आतंकवादविरोधी पथकाच्या माहितीनुसार मुर्शिदाबादमधील जलंगी येथील अनेक लोकही या बैठकीला उपस्थित होते.
५. संथाल परगणा भागातील साहिबगंज आणि पाकूर येथे मध्ये बंदी घातलेली जिहादी आतंकवादी संघटना जे.एम्.बी. सक्रिय आहे. या संघटनेशी संबंधित संशयित आणि भूमिगत कार्यकर्त्यांची माहिती त्यांनी गोळा केली.
संपादकीय भूमिका
|