पुणे येथे ‘जी.बी.एस्.’चा संसर्ग कोंबड्यांच्या विष्ठेमुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे झाला !

‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’चा प्राथमिक निष्कर्ष !

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था

पुणे – जानेवारीमध्ये पुणे येथे जी.बी.एस्. (गुईलेन बॅरे सिंड्रोम) या आजाराचा उद्रेक झाला होता. १८ फेब्रुवारीपासून जी.बी.एस्.चा एकही नवीन रुग्ण शहरात आढळला नाही. त्यामुळे जी.बी.एस्.चा संसर्ग संपल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने घोषित केले. जी.बी.एस्. आजाराचा उद्रेक कोंबड्यांच्या विष्ठेमुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे झाल्याचे ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’ने प्राथमिक निष्कर्ष काढला आहे.

या प्राथमिक निष्कर्षावर बोलतांना एन्.आय. व्ही.चे संचालक डॉ. नवीन कुमार यांनी सांगितले की, जी.बी.एस्. हा ८ ते ९ संसर्गामुळे होतो. ५० टक्के रुग्णांमध्ये संसर्ग कशामुळे झाला ? ते कारण कळत नाही. त्यामुळे आम्ही जी.बी.एस्. संसर्गासाठी कारणीभूत ठरणार्‍या सर्व जिवाणू, विषाणूंची आणि २६ रोगकारक घटकांची पडताळणी केली. ३०० हून अधिक नमुन्यांच्या पडताळणीत नोरोव्हायरस आणि कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आढळले; म्हणून वेगवेगळ्या घरांतील पाण्याच्या नमुन्यांचीही पडताळणी केली असता त्यात नोरोव्हायरस आणि कॅम्पायलोबॅक्टर आढळले