संपादकीय: हिजाबमागील चेहरा ओळखा ! 

प्रतिकात्मक छायाचित्र

‘एक दिवस असा येईल की, हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल. कदाचित् तो दिवस पहाण्यासाठी मी जिवंत नसेन’, असे अकलेचे तारे ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे हिंदुद्वेषी अध्यक्ष अन् खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तोडले आहेत. अर्थात् ओवैसी यांनी असे वक्तव्य केले, तरी ते त्यांचे स्वप्न आहे. लोकसभेतील मुसलमानांचे प्रतिनिधित्व चिंताजनक आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी एकूण ४८ जागा आहेत; पण एकही मुसलमान उमेदवार उभा राहिलेला नाही. त्याचप्रमाणे राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, देहली येथेही मुसलमान उमेदवार नाही. लोक जात, बेरोजगारी, महागाई इत्यादींवर मत देत आहेत. खरेतर लोकसभेच्या निवडणुकीत एकही मुसलमान उमेदवार उभे न करणे हे योग्यच आहे; कारण ते देशहितापेक्षा इस्लामचा प्रचार, धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल यांसारख्या गोष्टींना अधिक महत्त्व देऊन देशाचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करतात.

डॉ. माधवी लता यांचा धसका !

डॉ. माधवी लता

मुसलमान महिलेला पंतप्रधान करण्याविषयी खासदार असदुद्दीन ओवैसी यांना आताच खुमखुमी का आली ? याचे कारण म्हणजे सनातनच्या विरोधात आक्रमक असलेले खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कुटुंबाचा ४० वर्षांचा राजकीय बालेकिल्ला मोडून काढण्यासाठी भाजपने भाग्यनगर (हैद्राबाद) येथील लोकसभा मतदारसंघातून डॉ. माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना कट्टर हिंदुत्वाचा चेहरा मानला जातो. डॉ. माधवी लता या कट्टर हिंदु असूनही मदरशांना साहाय्य करतात. ‘मानवतेपेक्षा कोणताही धर्म मोठा नसून सनातनच्या विरोधात अनावश्यक वक्तव्य करणार्‍यांना खपवून घेतले जाणार नाही’, असे त्या सांगतात. त्यामुळे ओवैसी बंधूंनी याचा मोठा धसका घेतला आहे. यासाठी ते मुसलमान महिलेला पंतप्रधान करण्याची भाषा करत आहेत. ओवैसी यांच्या गडात घुसून डॉ. माधवी लता यांनी अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. तेथील मुसलमानांना चांगले शिक्षण मिळत नाही, यासाठी त्यांनी आवाज उठवला आहे. डॉ. माधवी लता ज्या समाजासाठी झटत आहेत, तो समाज पासमंदा मुसलमान आहे. त्यांनी या समाजासाठी भरपूर साहाय्य केले आहे. असे साहाय्य ओवैसी यांना करता आले नाही. त्यामुळे तेथील पासमंदा मुसलमान महिला ओवैसी यांच्यावर प्रचंड अप्रसन्न आहेत. अशा अनेक कारणांमुळे मुसलमान महिलेला पंतप्रधान करण्याची भाषा ओवैसी करत आहेत.

मुसलमान महिलेच्या हिंदुद्वेषाचे समर्थन !

खासदार असदुद्दीन ओवैसी

तेलंगाणात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी गोशामहल विधानसभा मतदारसंघात खासदार असदुद्दीन ओवैसी घरोघरी जात असतांना एके ठिकाणी एका मुसलमान महिलेने भाजपचे स्थानिक आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांना ठार मारण्याची धमकी दिली. असदुद्दीन ओवैसी यांना उद्देशून महिला म्हणाली, ‘‘हा (असदुद्दीन ओवैसी) वाघिणीचा मुलगा आहे. विरोधकांना संपवून टाका. सगळे जग तुमच्या पाठीमागे उभे आहे. राजासिंह यांच्या विरोधात कुणाला तरी उभे करा. मला त्याच्या विरोधात उभे करा. मी त्याची हत्या करते.’’ यातून प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना नेहमीच धर्मांध मुसलमानांकडून धोका असतो, हेच पुन्हा या घटनेतून लक्षात येते. या धमकीविषयी देशातील निधर्मीवादी आणि स्वतः ओवैसी यांनी तोंड उघडलेले नाही, यावरून त्यांचेही या धमकीला मौन समर्थन आहे, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ? जी महिला राजासिंह यांच्या विरोधात वक्तव्य करत आहे, अशा महिला उद्या पंतप्रधान झाल्या, तर सर्वत्र लढाईच होईल. हिंदूंवर अत्याचार वाढतील; मात्र असे होणे शक्य नाही आणि असे न होण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत.

कट्टरतावाद्यांचा मुसलमान महिलांना विरोध !

बेनझिर भुट्टो

बेनझिर भुट्टो २ डिसेंबर १९८८ या दिवशी मुसलमान जगतातील पहिल्या मुसलमान महिला पंतप्रधान बनल्या. ‘त्या पाकिस्तान देशाच्या पंतप्रधान जिथे मुसलमान स्त्रिया राज्य करू शकत नाहीत. ते इस्लामच्या विरोधात आहे’, असे कट्टरवाद्यांचे मत होते. अशा वेळी महिलांची शक्ती म्हणून बेनझिर भुट्टो उदयास आल्या. बेनझिर लोकशाहीच्या हक्कासाठी आणि हुकूमशाहीविरुद्ध लढत राहिल्या. त्या पाकिस्तानात इस्लामी कायद्याच्या कार्यवाहीच्या विरोधात होत्या. पाकिस्तानला एक लोकशाही देश बनवण्याच्या बाजूने त्या होत्या. ज्यात सर्वांना समान अधिकार मिळतील. महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी सतत लढा दिला. याच कारणामुळे २७ डिसेंबर २००७ या दिवशी रावळपिंडीत बेनझिर भुट्टो यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यावरून असे लक्षात येते की, कट्टरतावाद्यांना मुसलमान महिला पंतप्रधान नको. मुळात मुसलमान महिलांना सर्वत्र त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो. भारतीय मुसलमान महिला आंदोलनाने हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याची अनुमती मिळवून ऐतिहासिक विजय मिळवला. वर्ष २०१२ पूर्वी महिला हाजी अली दर्ग्यात जात असत; परंतु त्यानंतर हाजी अली दर्गा ट्रस्टने परंपरांचा हवाला देत महिलांना दर्ग्यामध्ये जाण्यास बंदी घातली. अशा गोष्टींवरून असे लक्षात येते की, ओवैसी यांनी देशावर मुसलमान महिलांना पंतप्रधान करण्याची गरळ ओकली, तरी प्रत्यक्षात मुसलमानांमधील कट्टरवादामुळे हे अशक्य आहे.

समजा, आता मुसलमान महिलेला पंतप्रधान केले, तर ‘ती खर्‍या अर्थाने देशाचा कारभार सक्षमपणे करू शकणार का ?’, हाही एक प्रश्न आहे. याचे कारण देशातील कोणत्याही ग्रामीण आणि शहरी भागातील बहुतांश ठिकाणी कोणत्याही जातीतील ज्या महिला सरपंच, अध्यक्ष, सभापती, आमदार, खासदार झाल्या, त्यांनी केवळ कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचे केवळ काम केले आहे. वास्तविक त्यांची सर्व कामे त्यांचे पती आणि कार्यकर्ते करत असतात. त्याप्रमाणे मुसलमान महिला पंतप्रधान झाल्या, तर त्या केवळ कठपुतळी बाहुल्या असतील. त्यांचे काम त्यांचे पती किंवा इतर कार्यकर्तेच करतील. येथे महत्त्वाचे सूत्र म्हणजे मुसलमान पंतप्रधान देशातील कायद्यांपेक्षा ‘शरीयत कायद्या’नुसार सर्वत्र कामकाज करण्याचा प्रयत्न करतील. बांगलादेशातील पंतप्रधान शेख हसीना या नावापुरत्याच पंतप्रधान असून त्यांचा सर्व कारभार त्यांच्या अवतीभवती फिरणारे चमचे करत असतात. त्यामुळे तेथे हिंदूंवर कितीही अत्याचार झाले, तरी शेख त्याकडे लक्ष देत नाहीत किंवा त्यांना काही करू दिले जात नाही. आजपर्यंतचा इतिहास पाहिला, तर मोगलांनी आतापर्यंत हिंदूंसह मुसलमान महिलांवरही अनेक अत्याचार केले आहेत. लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल, वक्फ बोर्ड, अशा अनेक गोष्टी भारतावर लादून हिंदूंचे खच्चीकरण करून हिंदुस्थानातून हिंदूंना संपवण्याचे कारस्थान मुसलमान कट्टरपंथी मुसलमान महिला पंतप्रधानांकडून करवून घेतील. असे अनेक धोके आहेत. असे होऊ नये; म्हणून हिंदूंनी संघटित होऊन कट्टरपंथियांच्या विरोधात लढा देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.

तिहेरी तलाकविरोधी कायदा आणि समान नागरी कायदा यांना विरोध करणारे ओवैसी हिजाबधारी महिला पंतप्रधान कसे देणार ?