१९६५ च्या भारत-पाक युद्धापूर्वी पाकिस्तानच्या फौजा भारतीय प्रदेशावर आक्रमण करत आत घुसत होत्या. त्यामध्ये भारतीय नागरिक मारले जात होते. नंतर मात्र ‘आमच्या फौजा चुकून भारतीय प्रदेशात गेल्या’, असे समर्थन पाकिस्तानकडून केले जायचे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मेजर जनरल य.श्री. परांजपे यांच्या भेटीच्या वेळी सावरकर परांजपे यांना म्हणाले, ‘‘पाकिस्तानचे सैनिक चुकून आपल्या इथे येतात, मग आपल्याही सैनिकांनी चुकून पाकिस्तानमध्ये जाऊन आक्रमण करायला काय हरकत आहे ?’ त्यावर जनरल परांजपे म्हणाले, ‘‘तात्या, हे कसे शक्य आहे ? दीड हजार मैलांच्या (२ सहस्र ४१४ कि.मी.) सरहद्दीवर कुठे कुठे गस्त घालायची ? कुठे त्यांना अडवायचे आणि कुठे आपण काही करायचे ?’’ सावरकर लगेच म्हणाले, ‘‘दीड हजार मैलांची सरहद्द आपल्याला आहे. त्यांना नाही का ? ते आत येऊ शकतात, आक्रमण करतात. तुम्हाला काय हरकत आहे ? असेच चुकून एक दिवस लाहोरपर्यंत जा आणि चुकून लाहोरही ताब्यात घ्या की !’’ मेजर जनरल परांजपे बघतच राहिले.
सनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > राष्ट्र-धर्म लेख > पाक लष्कराच्या खोडसाळपणाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा बिनतोड युक्तीवाद !
पाक लष्कराच्या खोडसाळपणाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा बिनतोड युक्तीवाद !
नूतन लेख
उत्तराखंडच्या मंत्र्यावर ‘या खुदा’ म्हणत मुसलमान तरुणाचा आक्रमणाचा प्रयत्न !
भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा इम्रान खान पाकसाठी अधिक धोकादायक ! – पाकिस्तानचे संरक्षणमंत्री
छत्रपती संभाजीनगर येथे मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणे आक्रमण !
भिवंडीत कॉलसेंटर चालवणारे आतंकवादी कह्यात
देशद्रोहाचा कायदा रहित केला जाऊ शकत नाही ! – विधी आयोग
इस्रो जुलैमध्ये ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपित करणार !