श्रीचित्शक्ती सौ. अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

‘काही साधकांच्या मनात विचार येतोे, ‘मी इतके प्रयत्न करूनही माझी साधनेत प्रगती होत नाही, याचे कारण काय आहे, ते आपण समजून घ्यायला हवे.’ तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना ‘आपली प्रगती होत नाही’, असे वाटत असते. संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय करणे, हीच त्यांची साधना असते. उपाय केल्याने त्यांची साधना होतच असते; परंतु त्यांचा जन्मोजन्मीचा त्रास अल्प होण्यासाठी त्यांनी केलेली साधना खर्च होत असते.
साधनेत अडथळे आणणारे विचार मनात येत असतील, तर त्यावर आपण स्वयंसूचना घ्यायला हव्यात. आपण स्वयंसूचना घेतली नाही, तर त्या विचारांचा आपल्यावर होणारा परिणाम नष्ट होण्यासाठी दिवसभर केलेली साधना खर्ची पडते. स्वयंसूचना घेतल्या, तर मनाला ‘टॉनिक’ मिळते आणि आपण चांगल्या प्रकारे साधना करू शकतो. यासाठी आपणच आपल्या मनाचा आढावा घेतला पाहिजे आणि स्वतःकडून साधनेचे प्रयत्न न झाल्यास स्वतःहून प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे, उदा. स्वयंसूचना सत्रांची नियोजित संख्या रात्रीपर्यंत पूर्ण झाली नाही, तर प्रसंगी देहाला त्रास होईल असे योग्य ते प्रायश्चित्त घ्यावे. देहाला त्रास झाला, तर मन आपोआप स्वयंसूचना सत्रे पूर्ण करण्याकडे लक्ष देईल.’
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (१५.४.२०२०)
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !