श्रीचित्शक्ती सौ. अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

‘काही साधकांच्या मनात विचार येतोे, ‘मी इतके प्रयत्न करूनही माझी साधनेत प्रगती होत नाही, याचे कारण काय आहे, ते आपण समजून घ्यायला हवे.’ तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना ‘आपली प्रगती होत नाही’, असे वाटत असते. संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय करणे, हीच त्यांची साधना असते. उपाय केल्याने त्यांची साधना होतच असते; परंतु त्यांचा जन्मोजन्मीचा त्रास अल्प होण्यासाठी त्यांनी केलेली साधना खर्च होत असते.
साधनेत अडथळे आणणारे विचार मनात येत असतील, तर त्यावर आपण स्वयंसूचना घ्यायला हव्यात. आपण स्वयंसूचना घेतली नाही, तर त्या विचारांचा आपल्यावर होणारा परिणाम नष्ट होण्यासाठी दिवसभर केलेली साधना खर्ची पडते. स्वयंसूचना घेतल्या, तर मनाला ‘टॉनिक’ मिळते आणि आपण चांगल्या प्रकारे साधना करू शकतो. यासाठी आपणच आपल्या मनाचा आढावा घेतला पाहिजे आणि स्वतःकडून साधनेचे प्रयत्न न झाल्यास स्वतःहून प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे, उदा. स्वयंसूचना सत्रांची नियोजित संख्या रात्रीपर्यंत पूर्ण झाली नाही, तर प्रसंगी देहाला त्रास होईल असे योग्य ते प्रायश्चित्त घ्यावे. देहाला त्रास झाला, तर मन आपोआप स्वयंसूचना सत्रे पूर्ण करण्याकडे लक्ष देईल.’
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (१५.४.२०२०)
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !
शांत, स्थिर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असलेले अकलूज येथील श्री. विष्णु जाधव !
अध्यात्माचे अनंतत्त्व !