
‘मणिकांत हा रामकृष्णांचा अनुग्रहित आहे. २८ वर्षांचा हा युवक विवाहित आहे. भगवंताची, राम-कृष्णाची, सत्संगाची विलक्षण ओढ आहे. त्याच्या पत्नीला ते रूचत नाही. मणिकांत रामकृष्णांना सांगतात, ‘‘पत्नी म्हणते, हे देव-देव बंद केले तर ठीक. नाहीतर मी आत्महत्या करीन. तुमच्यावर हत्येचा दोष लावीन. काय करू मी ?’’
श्रीरामकृष्ण गंभीर होतात. त्यांचे नेत्र चमकतात. ते उद्गारतात, ‘‘भगवंताच्या आड जी पत्नी येते, ती पत्नीच नाही. ती वैरीण ! तिचा त्याग करावा. सोडून दे तिला. भलेही ती आत्महत्या करू देत. हवे ते करू दे ! त्याची चिंता नको ! ईश्वराकडे जाण्यासाठी जी अटकाव करते, ती अविद्या ! तिला बाजूलाच सारले पाहिजे.’’
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१२)
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !
अध्यात्माचे अनंतत्त्व !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ देवलोकात होत असल्याची साधिकेला आलेली प्रचीती !