
मुंबई – राज्यघटनेच्या कलम १६४ (४) नुसार उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर कायम रहाण्यासाठी पदाची शपथ घेतल्यापासून ६ मासांच्या आत विधानसभा आणि विधान परिषद यांचे सदस्य होणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ या दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २८ मे या दिवशी ६ मासांचा कालावधी पूर्ण होत आहे. तोपर्यंत निवडणुकीचा दिनांक घोषित झाला नाही, तर मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळाला त्यागपत्र देऊन पुन्हा शपथ घ्यावी लागेल, असे राज्याचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे सध्या विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. २४ एप्रिल या दिवशी विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत; मात्र राज्यावर कोरोनाचे सावट असल्यामुळे निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीचा दिनांक घोषित केलेला नाही.
एक खरा हिंदु सर्वांना समानतेची वागणूक देतो ! : Annamalai
हनुमानगढी मंदिराच्या पायर्यांवर नमाजपठण करण्याचे पाप समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या सरकारांनी केले ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
(म्हणे) ‘रा.स्व. संघाच्या बेळगावमधील संचलनाला अनुमती देऊ नका !’ – भीम आर्मी
‘यू.एस्. इंडो-पॅसिफिक कमांड’चे ‘यू.एस्. पॅसिफिक कमांड’मध्ये नामांतर : भारतासाठी संदेश, परिणाम आणि पुढील दिशा
मंत्रालयाच्या बाहेरच राजकीय नेत्यांच्या अनधिकृत होर्डिंगजची उभारणी !
कुडाळच्या आठवडा बाजारात स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे मांडले दुकान !