विठ्ठला, समाजातील प्रत्येक घटकाला सुखी आणि समाधानी कर ! – मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलचरणी साकडे

‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याच्यावरील अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे. राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत’, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले.

वारकरी संप्रदायाचा महामंत्र अन् त्याचा अर्थ

‘रामकृष्ण हरि ।’ याचा अर्थ ‘रामासारखे आचरण ठेवले, तरच आज ना उद्या मनाने कृष्ण होता येते आणि मनाने कृष्ण झाल्याविना जगत् हरिरूप भासत नाही.’ यालाच ‘जीवन्मुक्ती’ असे म्हणतात. ही जीवनाची इतिश्री होय.’

विठ्ठलाच्या नामजपामुळे व्याधींपासून मुक्तता मिळत असल्याचे आधुनिक वैद्यांनी सिद्ध करणे !

‘पंढरपूरची वारी ही अतिशय विस्मयकारक आणि सर्वसामान्य मानवजातीला वरदानच ठरलेली आहे. सर्व वारकर्‍यांना काही ना काहीतरी व्याधी असते. असे असूनही ‘ते अडीचशे मैल अनवाणी प्रवास करून त्यांची प्रकृती उत्तम कशी रहाते ?’, याचे उत्तर आधुनिक वैद्यांनी प्रयोगाअंती शोधून काढले…

वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी ३० जूनला पंढरपूर येथे भव्य वारकरी अधिवेशन ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

अधिवेशन परमपूज्य श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी नारायणानंद सरस्वती यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

मानाच्‍या संत मुक्‍ताबाई पालखीचे पंढरपुरात आगमन !

मानाच्‍या सात पालख्‍यांपैकी एक असलेल्‍या संत मुक्‍ताबाई यांची पालखी आज पंढरपुरात पोचली आहे. दुपारी ३ वाजण्‍याच्‍या सुमारास ही पालखी पंढरपुरात पोचताच वरुणराजाने पर्जन्‍यवृष्‍टीने तिचे स्‍वागत केले.

दिंड्यांसाठी ६५ एकरमधील प्‍लॉटची जागा निश्‍चित करण्‍यासाठी भाविकांचे निवेदन !

दिंड्यांसाठी येथील ६५ एकर मधील प्‍लॉट कायमस्‍वरूपी निश्‍चित करण्‍यात यावेत, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी आरोग्‍यमंत्री तानाजी सावंत यांना दिले.

इंदापूर (पुणे) येथे संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा रंगला !

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्‍यातील दुसरे रिंगण इंदापूरमधील कस्‍तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्‍या प्रांगणामध्‍ये पार पडले. नगारखान्या पाठोपाठ २७ दिंड्या, संत तुकाराम महाजांची पालखी, ५० हून अधिक दिंड्या रिंगण प्रांगणामध्‍ये पोचल्‍या.

वारकर्‍यांसाठी महाराष्‍ट्र शासनाची विमा संरक्षण योजना !

या योजनेंतर्गत या कालावधीत एखाद्या वारकर्‍याचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍यास कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्‍यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्‍व आल्‍यास १ लाख आणि अंशत: अपंगत्‍व आल्‍यास ५० सहस्र रुपये, तसेच वारीच्‍या कालावधीत आजारी पडल्‍यास औषधोपचारासाठी ३५ सहस्र रुपयांपर्यंत खर्च मिळेल

आषाढी वारी मार्गावरील खासगी रुग्‍णालये चालू ठेवण्‍याच्‍या आरोग्‍यमंत्र्यांच्‍या सूचना !

वारकर्‍यांना तात्‍काळ आरोग्‍यविषयक सुविधा उपलब्‍ध होण्‍यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागाने ‘आरोग्‍याची वारी, पंढरीच्‍या दारी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पालखी मार्गावर आवश्‍यक त्‍या आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत.