जमावबंदीचा आदेश असतांनांही कल्याण येथे रस्त्यावर जमणार्‍या धर्मांधांवर गुन्हा नोंद

कायदा आणि पोलीस यांचा जराही धाक नसलेले धर्मांध नेहमीच समाजघातकी आणि देशविरोधी कृत्ये करतात !

कोरोनाच्या संकटाचा कुणीही संधी म्हणून उपयोग करू नका ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मी पोलिसांचे अभिनंदन करतो की, त्यांनी लाखो रुपयांचा ‘मास्क’चा साठा पकडला आहे. आपण थोडा समजूतदारपणा दाखवला पाहिजे. आपण जगणे थांबवलेले नाही, तर अधिक जगण्यासाठी जगण्याच्या शैलीत काही पालट केला आहे.

भिवंडी येथील मशिदीच्या विश्‍वस्तांवर गुन्हे नोंद

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

कस्तुरबा रुग्णालयातील १२ संशयितांना कोरोनाची लागण नसल्याचे निष्पन्न

येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात कोरोनाबाधित म्हणून उपचार चालू असलेल्या रुग्णांच्या दुसर्‍यांदा घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये १२ जणांना कोरोनाची लागण नसल्याचे आढळून आले आहे.

वांद्रे (मुंबई) येथून २५ लाख रुपयांचा मास्कचा साठा हस्तगत !

गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट ९ च्या पोलिसांनी २४ मार्च या दिवशी वांद्रे येथे २५ लाख रुपयांचा मास्कचा साठा पकडला आहे.

कारवाईसाठी पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य ; जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत ठेवणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य आणि जिल्हा प्रवेशबंदी अन् संचारबंदी यांसारख्या निर्णयांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.

गुढीपाडवा आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करा ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

गुढीपाडवा आणि नववर्ष यांच्या स्वागतासाठी सज्ज होत असतांना या वर्षी आपले राज्य, तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कळंबा कारागृहामधील ४५० बंदीवानांना तात्पुरता जामीन मिळण्याची शक्यता

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यासह देशातील मध्यवर्ती आणि जिल्हा कार्यालयात शिक्षा भोगणार्‍या बंदीवानांची गर्दी न्यून करण्यासाठी बंदीवानांना तात्पुरत्या जामीन (पॅरोल)वर सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

मालमत्ताकर, पाणीपट्टी ‘ऑनलाईन’ भरण्याचे महानगरपालिकेचे आवाहन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत ‘लॉकडाऊन’ घोषित केला असून या कालावधीत नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने न्यूनतम संपर्कात येणे, त्याचप्रमाणे गर्दी टाळणे आवश्यक आहे.

संभाजीनगर येथे ‘सारी’ या व्याधीमुळे रुग्णाचा मृत्यू

येथील एका रुग्णाचे ‘सारी’ (सिव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) या व्याधीमुळे २४ मार्च या दिवशी निधन झाले. सारी आणि कोरोना यांची लक्षणे समान आहेत.