Andhra Pradesh Accident Cricket:चालक आणि सहचालक क्रिकेट पहात बसल्याने आंध्रप्रदेशात झाला होता रेल्वे अपघात !

अपघाताचे कारण शोधल्यानंतर पुढील वेळी या कारणामुळे अपघात होऊ नये, म्हणून त्यावर उपाय शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

वर्ष २०२३ मध्ये देश-विदेशांत झालेल्या विविध महत्त्वाच्या घटना

वर्ष २०२३ आज संपत आहे. या वर्षात भारतासह देश-विदेशांत वर्षभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे केवळ मथळे येथे देत आहोत.

नगर येथे आष्टी रेल्वेच्या २ डब्यांना भीषण आग

आग लागण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही; मात्र आगीत रेल्वेची प्रचंड हानी झाली. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होते.

बक्सर (बिहार) येथे रेल्वे गाडी रुळावरून घसरल्याने ४ प्रवाशांचा मृत्यू : ८० जण घायाळ

टूरीगंजे ते रघुनाथपूर या मार्गावर हा अपघात झाला. या ठिकाणी आता बचावकार्य चालू करण्यात आले आहे. घायाळ प्रवाशांना पाटलीपुत्र येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही रेल्वे देहलीहून आसाममधील कामाख्या येथे चालली होती.

पुणे येथे रेल्‍वेचा भीषण अपघात घडवण्‍याचा प्रयत्न फसला !

आकुर्डी ते चिंचवडच्‍या दरम्‍यान असलेल्‍या ‘रेल्‍वे ट्रॅक’वर ६ ऑक्‍टोबर या दिवशी दगड रचले होते. यातून भीषण अपघात करण्‍याचा प्रयत्न होता; मात्र रेल्‍वे गार्डसह माहीतगार्‍यांनी दिलेल्‍या माहितीमुळे त्‍यांचा हा डाव फसला आहे.

पावसाने झोडपले : नद्यांना उधाण, कोकण रेल्वे सेवा ठप्प

गोवा राज्यात आणि शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सलग दुसर्‍या दिवशीही चालूच होता. जोरदार वारे आणि पाऊस यांच्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. संक्षिप्त वृत्तांत देत आहोत.

गोवा : करंझोळला रेल्वेमार्गावर दरड कोसळली 

संततधार पडणारा पाऊस आणि त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने, तसेच जमीन फुगल्याने, दूधसागर ते कॅसलरॉक यामधील करंझोळ रेल्वेस्थानकाच्या ब्रागांझा घाटात दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली.

‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवरील आक्रमणे आणि ‘कोरोमंडल’ एक्सप्रेसची दुर्घटना यांमागे जिहादी षड्यंत्र ! – आर्.एस्.एन्. सिंह, संरक्षणतज्ञ, देहली

बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात होऊन त्यात ३०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. ३१ मार्च देहलीच्या शाहीनबागमधील एक धर्मांध केरळमध्ये गेला. तेथे त्याने अलपुझा-कन्नूर एक्सप्रेसमध्ये  पेट्रोल टाकून प्रवाशांना पेटवून दिले.हे ‘गझवा ए हिंद’ आहे. यालाच ‘जिहाद’ म्हणतात, असे मत त्यांनी व्यक्त केले

ओडिशा रेल्वे अपघाताच्या प्रकरणी रेल्वेचा कनिष्ठ अभियंता आमीर खान पसार

अपघातानंतर सीबीआयने आमीर खान याची चौकशी केली होती. तेव्हापासून तो कुटुंबासह बेपत्ता आहे. या अपघातामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम’मध्ये छेडछाड झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.

अंबरनाथ रेल्वेस्थानकाजवळ लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने वाहतूक विस्कळीत !

अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ लोकलगाडीचा डबा रुळावरून घसरला. साइडिंग मार्गिकेवरून मुख्य मार्गिकेवर रिकामी लोकलगाडी येत असतांना सकाळी ८.२५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.