बक्सर (बिहार) येथे रेल्वे गाडी रुळावरून घसरल्याने ४ प्रवाशांचा मृत्यू : ८० जण घायाळ

नॉर्थ-इस्ट एक्स्प्रेसचे २० डबे रुळावरून घसरल्याने झालेला अपघात

बक्सर (बिहार) : येथे नॉर्थ-इस्ट एक्स्प्रेसचे २० डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ८० जण घायाळ झाले. टूरीगंजे ते रघुनाथपूर या मार्गावर हा अपघात झाला. या ठिकाणी आता बचावकार्य चालू करण्यात आले आहे.

 (सौजन्य : Republic Bharat)

घायाळ प्रवाशांना पाटलीपुत्र येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही रेल्वे देहलीहून आसाममधील कामाख्या येथे चालली होती.