प्रदूषणामुळे तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) नंतर आता शिरोळ बंधार्‍यात सहस्रो मासे मृत्यूमुखी

निष्क्रीय आणि दायित्वशून्य प्रदूषण मंडळ !

साहाय्यक नद्यांतील दूषित पाणी नर्मदा नदीत मिसळू देणे देशासाठी घातक ! – द्वारका आणि ज्योतिष पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती  

शहरांतील नाल्यांचे पाणी नदीमध्ये सोडले जाते याचे दायित्व सरकार आणि स्थानिक प्रशासन यांचे आहे. नर्मदेला आम्ही ‘आई’ मानतो आणि प्रत्येकाची तिच्यावर श्रद्धा आहे.

वाळव्याच्या बहे (जिल्हा सांगली) येथील रामलिंग बेटाजळ कृष्णा नदीच्या पात्रात दूषित पाण्यामुळे सहस्रो मासे मृत्यूमुखी

वारंवार सहस्रो मासे मृत्यूमुखी पडूनही त्याविरोधात कोणतीही ठोस कृती न करणारे निष्क्रीय प्रदूषण मंडळ !

कोळसा खाणींमुळे वणी ताक्यातील शेती व्यवसायाची पुष्कळ हानी

परिसरातील कोळसा खाणींमुळे प्रदूषणात झालेली वाढ, कृत्रिम टेकड्या आणि जंगले यांमुळे शेती व्यवसायाची पुष्कळ हानी झाली आहे. अकार्यक्षम प्रदूषण नियंत्रण मंडळामुळे खाण प्रशासन उद्दाम झाले आहे. प्रदूषणामुळे उत्पन्न अल्प झाले आहे.

८ वर्षे जुनी गाडी असलेल्यांना आता ‘हरित कर’ भरावा लागणार !

८ वर्षे जुन्या वाहनांवर लवकरच हरित कर (‘ग्रीन टॅक्स’) आकारला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘ग्रीन टॅक्स’ आकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

कोट्यवधी रुपये व्यय करूनही पिंपरी-चिंचवड शहरातील नद्या प्रदूषितच !

यातून कोट्यवधी रुपये वाया गेले असेच झाले. संबंधितांची चौकशी करून तात्काळ कारवाई होणे अपेक्षित !

रसायनयुक्त जुन्या साड्या नदीपात्रात धुवून पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या घटकांवर कठोर कारवाई करा ! – करवीर शिवसेना

ग्राहकांची फसवणूक करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी, करवीर विभाग यांचे स्वीय सहाय्यक श्री. संजय घोरपडे यांना देण्यात आले.

प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या अकोला आणि अमरावती महानगरपालिकांवर कारवाई कधी ? – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही कारवाई न करणार्‍या अकोला आणि अमरावती या महानगरपालिकांविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळ कधी कारवाई करणार ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला.

पावसामुळे पुण्याच्या प्रदूषणात घट !

३ शहरांच्या तुलनेत पुणे शहराची हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे निरीक्षण

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे वायूप्रदूषणामुळे प्रतिवर्षी ३ लाख ५० सहस्र गर्भपात !

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांत मोठ्या प्रमाणात होणार्‍या वायुप्रदूषणामुळे प्रतिवर्षी ३ लाख ४९ सहस्र ६८१ गर्भपात होतात, असे लँसेट हेल्थ जर्नलच्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.