वाढत्या कोरोनाबाधितांमुळे गोव्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या स्थितीत

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचाराला प्रारंभ होण्यासाठी किमान ६ घंटे प्रतीक्षा करावी लागत आहे.

बेंगळुरू येथील ऑक्सफर्ड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड !

४-५ घंटे मृतदेह भूमीवरच पडून ! रुग्णालय व्यवस्थापनाची अशी असंवेदनशीलता वैद्यकीय सेवेला कलंकच होत ! अशा घटनेला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

अमरावती येथे शववाहिका न मिळाल्याने कोरोना रुग्णांचे २ मृतदेह शाळेच्या बसमधून स्मशानभूमीत पोचवले !

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची बैठक घ्या ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्ण आणि नातेवाईक यांची आर्थिक लूट होत आहे.

देव तारी.. !

‘न मे भक्तः प्रणश्यति।’ असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. साधना करून आपण भक्त बनलो, तरच त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. संकटामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अस्वस्थता यांवर मात करण्यासाठी साधनाच करणे अपरिहार्य आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय क्षेत्रातील साहाय्य उपलब्ध करून देणारे सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते !

कोरोनाच्या संकटकाळात सैरभैर झालेल्या सामान्य नागरिकांना वैद्यकीय क्षेत्रातील साहाय्य उपलब्ध करून देणारे सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी आदर्शच आहेत. हाच आदर्श घेऊन अन्य कार्यकर्ते आणि संघटना यांनीही नागरिकांना साहाय्य करण्यासाठी पुढे यावे !

हिंगोली येथील औषध विक्रेत्याचा परवाना रहित करण्याची भरारी पथकाची शिफारस !

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्थापन केलेल्या भरारी पथकाने शहरातील ‘दिवेश मेडिकल’ या दुकानाची पडताळणी केली. तेव्हा तेथे इंजेक्शनचा साठा आणि विक्री यांचा ताळमेळ आढळून आला नाही.

ऑक्सिजनअभावी ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा आरोप !

ऑक्सिजन संपल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप मनसेकडून करण्यात आला आहे, तर ऑक्सिजन संपत आल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून तजवीज करण्यात आली नसल्याने रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने २ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची तातडीने चौकशी करा !

जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजन पुरवठा अज्ञात व्यक्तीने बंद केल्याने येथील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले.

कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही, ७ ठिकाणी ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प नियोजित ! – जिल्हाधिकारी

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही.