वाढत्या कोरोनाबाधितांमुळे गोव्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या स्थितीत
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचाराला प्रारंभ होण्यासाठी किमान ६ घंटे प्रतीक्षा करावी लागत आहे.
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचाराला प्रारंभ होण्यासाठी किमान ६ घंटे प्रतीक्षा करावी लागत आहे.
४-५ घंटे मृतदेह भूमीवरच पडून ! रुग्णालय व्यवस्थापनाची अशी असंवेदनशीलता वैद्यकीय सेवेला कलंकच होत ! अशा घटनेला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
अमरावती येथे शववाहिका न मिळाल्याने कोरोना रुग्णांचे २ मृतदेह शाळेच्या बसमधून स्मशानभूमीत पोचवले !
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्ण आणि नातेवाईक यांची आर्थिक लूट होत आहे.
‘न मे भक्तः प्रणश्यति।’ असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. साधना करून आपण भक्त बनलो, तरच त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. संकटामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अस्वस्थता यांवर मात करण्यासाठी साधनाच करणे अपरिहार्य आहे.
कोरोनाच्या संकटकाळात सैरभैर झालेल्या सामान्य नागरिकांना वैद्यकीय क्षेत्रातील साहाय्य उपलब्ध करून देणारे सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी आदर्शच आहेत. हाच आदर्श घेऊन अन्य कार्यकर्ते आणि संघटना यांनीही नागरिकांना साहाय्य करण्यासाठी पुढे यावे !
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्थापन केलेल्या भरारी पथकाने शहरातील ‘दिवेश मेडिकल’ या दुकानाची पडताळणी केली. तेव्हा तेथे इंजेक्शनचा साठा आणि विक्री यांचा ताळमेळ आढळून आला नाही.
ऑक्सिजन संपल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप मनसेकडून करण्यात आला आहे, तर ऑक्सिजन संपत आल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून तजवीज करण्यात आली नसल्याने रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजन पुरवठा अज्ञात व्यक्तीने बंद केल्याने येथील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकार्यांना दिले.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही.