शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांचे आंदोलन !
महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.
नवी देहली येथील रामलीला मैदानात संयुक्त किसान मोर्चाकडून महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते.
एकदा गेलेली वेळ पुन्हा आणता येत नाही, या नियमानुसार गेलेले मनुष्यघंटेही पुन्हा आणता येत नाहीत. प्रशासनाने या सर्वांचा विचार करून जनतेच्या समस्या वेळेत सोडवाव्यात, हीच अपेक्षा !
जिल्ह्यातील सवालाख शेतकर्यांना पीक विमा आस्थापनांनी लुटले, तसेच मोठा घोळ केला, असा दावा केला जात आहे. भरलेला आणि मिळालेला पीक विमा यांत प्रचंड तफावत आहे. त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला..
आंदोलनाला सातारा जिल्ह्यातील कराड येथे हिंसक वळण लागले. कराड तालुक्यातील इंदोली येथे मध्यरात्री अज्ञाताने उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला. त्यामुळे ऊस दरासाठीचे आंदोलन चिघळले आहे.
जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकर्यांनी हानीभरपाईसाठी ९ नोव्हेंबर या दिवशी येथील जायकवाडी धरणाच्या ‘बॅकवॉटर’मध्ये उतरून ‘जलसमाधी’ आंदोलन केले.
एफ्.आर्.पी. (फिक्स्ड रिझर्व्ह प्राईस ) म्हणजेच राखीव किंमत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथील अलका चौक ते साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
आतापर्यंत आंदोलकांनी १२ टायर फोडले असून वाखरी तालुका येथील थोरात पेट्रोलपंपाच्या समोर ही घटना घडली.
जिल्ह्यातील गंगापूर आणि संभाजीनगर येथील शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी गंगापूर तालुक्यातील शेतकर्यांकडून गंगापूर-वैजापूर मार्गावर मांजरी फाटा येथे २१ ऑगस्ट या दिवशी १ घंटा ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले आहे.
सध्या आंदोलनांच्या संदर्भात ‘टूलकिट’चा वापर झाला असला, तरी ‘टूलकिट’ हे मोठ्या प्रमाणात ‘कॉर्पाेरेट्स’, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था आणि अनेक जण आपापल्या कामांसाठी वापरतात. अल्प वेळेत अधिक लोकांपर्यंत योजना पोचावी, यासाठी ‘टूलकिट’चा वापर केला जातो.