मुंबई, २० मार्च (वार्ता.) – शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विरोधी गटातील आमदारांनी २० मार्च या दिवशी विधानभवनाच्या पायर्यांवर बसून घोषणा देऊन निदर्शने केली. ‘आंबा, काजू, कांदा आणि कापूस पिकाला भाव मिळालाच पाहिजे’, ‘गारपीटग्रस्तांना हानीभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा’, अशा घोषणा त्यांनी या वेळी दिल्या. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. विरोधी गटातील आमदारांनी कांदा आणि द्राक्षे यांच्या टोपल्या घेऊन विधानभवनात प्रवेश केला, याच टोपल्या घेऊन त्यांनी पायर्यांवर बसून आंदोलन केले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांचे आंदोलन !
शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांचे आंदोलन !
नूतन लेख
- SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये एकूण ९ सहस्र ६१० कोटी रुपयांचा अपहार !
- गोवा : केरी येथे पार पडला श्री विजयादुर्गा देवस्थानचा सुवर्ण शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सव !
- गोवा : कला अकादमीतील एका ‘फॉल्स सिलिंग’चा भाग कोसळला !
- ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी’ का चालत नाही ? – संजय राऊत
- ७० वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देहली येथे होण्याची शक्यता !
- वर्ष २०१९ मध्ये भाजपसमवेत जाण्यासाठी अजित पवार यांना माझी मान्यता होती ! – शरद पवार