एन्.सी.बी.कडून राहिला फर्निचरवाला हिला अटक

. एन्.सी.बी.ने या प्रकरणी ४ फेब्रुवारी या दिवशी रात्री २ जणांना अटक केली आहे. यामध्ये एक ब्रिटीश नागरिक करण सजनानी आहे, तर दुसरी राहिला फर्निचरवाला आहे. राहिला ही अभिनेत्री दिया मिर्झा हिची साहाय्यक (असिस्टंट) होती. एन्.सी.बी.ने गेल्या मासात विविध लोकांकडून २०० किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले होते.

एम्.डी. तस्करीप्रकरणी माफिया पठाणला अटक

एम्.डी. (नशायुक्त पदार्थ) तस्करी प्रकरणात राज्य आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार (कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेज नसरुल्ला खान उपाख्य चिंकू पठाण (वय ४० वर्षे) याला अटक केली आहे.

भोजनातून गुंगीचे औषध देऊन ९ कलाकारांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची चोरी

हे सर्व कलाकार लातूर जिल्ह्यातील राचनवाडी येथील असून हे सर्वजण देवीच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. ‘सीसीटीव्ही’च्या साहाय्याने पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

अमली पदार्थांच्या विळख्यात भारतातील भावी पिढी !

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील १० ते १७ वयोगटांतील १ कोटी ४८ लाख मुले अल्कोहोल, अफीम, कोकेन, भांग यांसारख्या अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे.

रायगड येथून अमली पदार्थ विक्रेत्यास अटक

अमली पदार्थ विक्रेता आरिफ भुजवाला याला अमली पदार्थ नियंत्रक विभागाने रायगडमधून अटक केली आहे. आरिफ हा दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीश इब्राहिमचा जवळचा साथीदार असल्याचे सांगितले जात आहे.

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी एन्.सी.बी.च्या मुंबई पाठोपाठ पुण्यातही धाडी

अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एन्.सी.बी.) पथकाने मुंबई पाठोपाठ पुण्यातील हडपसर आणि खडकवासला परिसरात धाडी टाकल्या.

नागपूर कारागृहातील गुन्हेगारासाठी चरस नेणारा सुरक्षारक्षक निलंबित !

पोलीस शिपायाने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याला बडतर्फ करणेच उचित ठरेल !

कळंगुट येथे २ ठिकाणी अमली पदार्थ जप्त

पहिल्या प्रकरणात खेड, रत्नागिरी येथील  एका २१ वर्षीय युवकाकडून १ किलो २०० ग्रॅम (किंमत सुमारे १ लाख २० सहस्र रुपये) वजनाचे अमली पदार्थ, तर दुसर्‍या प्रकरणात पश्‍चिम बंगाल येथील १९ वर्षीय शब्बीर अली खान याच्याकडून १ लाख रुपये किमतीचा गांजा कह्यात घेण्यात आला आहे.

मुंबईत अमली पदार्थांची विक्री करून हवालामार्गे आतंकवाद्यांना पैसा पुरवला जातो

मुंबईत अमली पदार्थांची विक्री होवून आतंकवाद्यांना पैसा जात असेल, तर पोलिसांनी हे लक्षात का आले नाही ? ही पोलिसांची निष्क्रियता नव्हे का ?

नागपूर येथील केंद्रीय कारागृहात पोलीस शिपाईच अमली पदार्थाचा पुरवठा करत होता !

कारागृहात जाणार्‍या पोलिसांचीच अंगझडती घ्यावी लागते, हे दुदैव होय !