गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी दिले होते निर्देश !

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे केवळ कबर दिसली पाहिजे, तिथे एक मोठा फलक लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला, हा आमचा इतिहास. आम्ही कुणाला गाडले, हे जगाला कळू द्या, तसेच तिकडे लहान मुलांच्या सहली गेल्या पाहिजेत, असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित मेळाव्यात केले होते. त्यानुसार २ एप्रिलला मनसेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात ‘आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला’, असे फलक लावले आहेत.
राज साहेबांच्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात मनसेतर्फे चौका चौकात बॅनर लावण्यात आले आहेत,प्रत्येक किलोमिटर वर हे दिशादर्शक बॅनर लावण्यात आले असून मनसे जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर यांनी हे बॅनर लावले आहेत..
#छत्रपतीसंभाजीनगर #RajsahebThackeray #SumitKhambekar pic.twitter.com/0JeqkGYh0L
— Sumit Khambekar (@KhambekarSumit) April 2, 2025
मनसेने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले असून यात खालील ५ प्रमुख मागण्या केल्या आहेत –
१. औरंगजेबाच्या कबरीजवळ जर सजावट असेल, तर ती त्वरित काढली जावी.
२. यापुढे कुठलाही सरकारी खर्च येथे करायचा नाही.
३. सर्व शाळांतील मुलांच्या शैक्षणिक सहली तिथे काढण्याचा आदेश देण्यात यावा.
४. तिथे ‘आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला’, अशा आशयाचा फलक लावण्यात यावा.
५. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत.
(या मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनालाच ते लक्षात आले पाहिजे. – संपादक)
पहा, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित मेळाव्यात केलेले वक्तव्य –
|