छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यावरून केंजळ (जिल्हा सातारा) ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन आमने-सामने !
रितसर अनुमती घेऊन पुतळा स्थापन करण्याविषयी पोलिसांनी विनंती केली; मात्र पुतळा हलवणार नाही, अशी भूमिका घेत केंजळ येथील युवक आणि ग्रामस्थ आमने-सामने आले. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.