‘ईडी’ने ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’च्या बिशपला कह्यात घेतले !

आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’च्या विविध ठिकाणांवर २५ जुलै या दिवशी धाडी टाकल्यानंतर आता चर्चचे बिशप धर्मराज रसलाम यांना कह्यात घेण्यात आले आहे.

तेलंगाणा येथील कु. ओम कुलकर्णी याला १० वीच्या परीक्षेत ९५.८० टक्के गुण !

आपल्या यशाविषयी कु. ओम म्हणाला, ‘‘मी प्रतिदिन शनीमंत्र म्हणत असे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या साधनेतील नामजप करणे, कापूर आणि अत्तर यांचे उपाय करणे यांमुळे मनाची एकाग्रता होण्यास पुष्कळ साहाय्य झाले.

उत्तरप्रदेशातील सामूहिक बलात्कार प्रकरणी माजी आमदाराच्या मुलाला पुणे येथून अटक !

उत्तरप्रदेशात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारे समाजवादी पक्षाचे भदोहीचे माजी आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णु मिश्रा यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार !

चंदगड तालुक्यातील कुदनूर या गावात २३ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा पुतळा साडेचार टन वजनाचा असून तो लोकवर्गणीतून उभारण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ९ ते १७ ऑगस्ट ‘स्वराज्य महोत्सव’ ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘मोहिमेत जिल्ह्यासाठी ६ लाख ३ सहस्र राष्ट्रध्वज लागतील. नागरिकांनी ९०० मिमी बाय ६०० मिमी आणि ४५० बाय ३०० मिमीचे ध्वज घरावर लावावेत. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी.’’

‘गटारी नव्हे, तर दीप अमावास्या’, असे फलक लावून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून समाजाचे प्रबोधन !

दीप (दिवे धुण्याच्या) अमावास्येला काही विकृत लोक गटारी अमावास्या असे संबोधून हिंदु धर्म अपकीर्त करतात. मुळात गटारी असा काही सण हिंदु धर्मात नाही. तरी शहरात ठिकठिकाणी ‘गटारी नव्हे, तर दीप अमावास्या’, असे फलक लावून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून समाजाचे प्रबोधन करण्यात येत आहे.

राज्यात १७३ जणांना ‘स्वाईन फ्ल्यू’ची लागण !

राज्यात ‘स्वाईन फ्ल्यू’चा (विशिष्ट विषाणूंमुळे येणारा ताप) धोका वाढत आहे. पावसाळा चालू झाल्यापासून या तापाचे रुग्ण वाढले आहेत.

सोलापूर येथे वाहतुकीचे नियम तोडणार्‍या २२ शालेय बस जप्त !

सोलापूर आणि अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकांकडून विविध भागांत कारवाई करण्यात आली. शालेय बसचालकांना दंड करून त्यांच्याकडून २ लाख ७५ सहस्र ५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.

वागळे (चाळीसगाव) येथे पाटलीपुत्र एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन वेगळे झाले !

चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या जवळच्या वागळे गावाजवळ एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन वेगळे झाले. या घटनेत कुठलीही जीवित किंवा अनुचित घटना घडलेली नाही.

मुंबईमधील २३६ प्रभागांसाठी २९ जुलै या दिवशी आरक्षण सोडत !

महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडत २९ जुलै या दिवशी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर सभागृह येथे काढण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या सोडतीमध्ये इतर मागासवर्गासाठी ६३ प्रभागांतील आरक्षण आणि महिला आरक्षण घोषित होणार आहे.