गोवा राज्यातून नगर येथे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या ४ कोरोनाबाधित रुग्णांना पुन्हा गोवा राज्यात पाठवले

कोरोनाबाधित असलेले ४ रुग्ण घेऊन गोवा राज्यातून महाराष्ट्रातील नगर येथे जाणार्‍या रुग्णवाहिकेला मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा येथील पोलीस तपासणीनाक्यावर पोलिसांनी अडवले अन् पुन्हा गोवा राज्यात पाठवले.

कोनगाव (भिवंडी) येथील बकरी बाजारात ग्राहकांची गर्दी

कोरोनाचे नियम मोडणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी, हिंदूंवर मर्दुमकी गाजवत कारवाई करणारे पोलीस अन्य धर्मियांच्या कृत्यांकडे मात्र दुर्लक्ष करतात. असे दुटप्पी पोलीस काय कामाचे ?

राज्यातील २४ जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांची वाढ रोखणे, हे आमचे ध्येय ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मागील २ आठवड्यांशी तुलना केली, तर राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमधील कोरोनाची रुग्णसंख्या न्यून झाली आहे; मात्र अद्यापही २४ जिल्ह्यांतील रुग्णांची वाढ कायम आहे.

पालघरवासियांवर आता रेल्वेमध्ये कोरोनाचे उपचार होणार !

रेल्वेच्या विशेष विलगीकरण डब्यांमध्ये पालघरवासियांवर कोरोना संदर्भात उपचार करण्यात येणार आहेत. विलगीकरण डब्यांची रेल्वे पालघरमध्ये आली असून गाडीत ३७० कोरोनाबाधितांवर उपचार करणे शक्य होणार आहे

दिवसभरात २ सहस्र ८१४ कोरोनाबाधित, तर ५२ रुग्णांचे निधन

राज्यात ४ मे या दिवशी कोरोनाबाधित २ सहस्र ८१४ नवीन रुग्ण आढळले आहेत. ४ मे या दिवशी कोरोनाशी संबंधित एकूण ६ सहस्र ५५२ चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ४२.९४ टक्के आहे.

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे हनन म्हणजे नियोजित षड्यंत्रच ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आंध्रप्रदेशात सरकार मंदिरांचे कोट्यवधी रुपये घेते, तर ते मंदिरांना सुरक्षा का पुरवत नाहीत ? दोनशेहून अधिक मंदिरांत एकाच पद्धतीने आघातांच्या घटना घटतात, तेव्हा ते हिंदूंच्या श्रद्धांचे हनन करण्याचे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे सरकारला का कळत नाही ?

मुंबई-गोवा महामार्गावरील मळगाव बॉक्सवेलजवळ बसवलेले बहिर्वक्र आरसे अज्ञाताने फोडले

सावंतवाडी ते रेडी मार्गावरील मळगाव येथील बॉक्सवेलजवळ (मुख्य मार्गाच्या खालून जाण्यासाठी केलेला मार्ग) वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मळगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘बहिर्वक्र आरसे’ लावण्यात आले आहेत. यातील २ आरशांची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली.

जपानच्या पंतप्रधानांचे निवासस्थान भुताच्या भीतीने ९ वर्षे रिकामीच !

जपानमध्ये अंनिसवाले नाहीत, हे बरे झाले अन्यथा पंतप्रधांना ‘विज्ञानविरोधी’ संबोधून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असती !

पुणे येथील मृत्यू पावलेल्या खातेधारकाचे पैसे बँक अधिकार्‍यांनीच काढले !

घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळे खासगी असो वा शासकीय क्षेत्र असो, भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !

या स्थितीला उत्तरदायी कोण ?

कोरोनामुळे बेंगळुरू शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये अनेक घंटे रांगेत उभे रहावे लागत आहे. चामराजपेटमधील एका स्मशानभूमीबाहेर तर ‘हाऊस फुल’ असा फलकच लावण्यात आला आहे.