महाराष्ट्राचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची एन्.सी.बी.कडून चौकशी

या प्रकरणाची सरकारने तात्काळ नि:पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !

भाजपचे उपमहापौर राजेश काळे पक्षातून बडतर्फ

उपमहापौर राजेश काळे यांना भाजप पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. राजेश काळे यांच्यावर महापालिका आयुक्त आणि उपायुक्त यांना खंडणीसाठी धमकावणे, शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, असे आरोप उपायुक्त धनराज पांडे यांनी दिलेल्या तक्रारीत करण्यात आले होेते.

प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित केल्याचे शासनाने लेखी आश्‍वासन द्यावे ! – मेळावली ग्रामस्थ

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित केल्याचे शासनाने लेखी आश्‍वासन द्यावे. ग्रामस्थांना शासनाचे तोंडी आश्‍वासन नको, तसेच शासनाने ग्रामस्थांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या सर्व तक्रारी मागे घ्याव्यात, अशी मागणी शेळ-मेळावली ग्रामस्थांनी केली आहे.

रेखा जरे हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा !

येथील ‘यशस्विनी ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्याप पसार असून त्याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. तरीही तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. यामुळे तपास रेंगाळला असून संशयाला वाव मिळत आहे.

आगारातून सुटणार्‍या वस्तीच्या बसगाड्या त्वरित चालू करा ! – मंगेश तळवणेकर, माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती

सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथून सकाळी ६ वाजता सुटणारी साटेली, कोंडुरे, आरोस बाजार, रोणापाल, मडुरा, शेर्ला ते बांदा ही बसगाडी शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या तसेच गोरगरीब कामगार, छोटे-मोठे भाजी विक्रेते यांच्यासाठी चालू होती.

वर्ष २००८ च्या मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार जकी उर रहमान लखवी याला १५ वर्षांची शिक्षा

प्रत्यक्षात हे आतंकवादी मोकाटच फिरतात आणि त्यांच्या कारवाया चालू असतात, असे यापूर्वी आतंकवादी हाफिज सईद याच्या उदाहरणातून उघड झाले आहे !

स्वतंत्र ग्रामपंचायत मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील १२ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार !

१२ गावांतील गावकर्‍यांनी वारंवार मागणी करूनही स्वतंत्र ग्रामपंचायत सिद्ध न करणे हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे.

मेळावली प्रकरणी ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे मनोज परब आणि रोहन कळंगुटकर यांना सशर्त जामीन संमत

मेळावली प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेले ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे (आर्.जी.) मनोज परब आणि रोहन कळंगुटकर यांना येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने १३ जानेवारी या दिवशी सशर्त जामीन संमत केला.

‘आंचिम’च्या जागतिक पॅनोरमा विभागात एकूण ५० चित्रपट प्रदर्शित होणार

१६ ते २४ जानेवारी या कालावधीत राजधानी पणजी शहरात होणार्‍या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) जागतिक पॅनोरमा विभागात झळकणार्‍या चित्रपटांची सूची घोषित झाली आहे. यंदा जागतिक पॅनोरमा विभागात एकूण ५० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

सोलापूर येथील सिद्धेश्‍वर यात्रेतील अक्षता सोहळा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने

या सोहळ्यानिमित्त सम्मती कट्टा परिसर फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. या वेळी पालखीचे पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा या वर्षी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आणि शासनाच्या नियमांचे पालन करत पार पडला.