राज्यात पाच दिवसांत १ सहस्र ८३९ पक्ष्यांचा मृत्यू

राज्यात गेल्या पाच दिवसांपासून १ सहस्र ८३९ पक्ष्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. मुंबई, दापोली, परभणी, लातूर येथील पक्ष्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव दिसून आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अरुणा धरण प्रकल्पग्रस्ताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी

तालुक्यातील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या (धरणाच्या)  बुडित क्षेत्रात घर आणि भूमी जाऊनही त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही, तसेच निवासी भूखंडाची ताबा पावती मिळालेली नाही. त्यामुळे आलेल्या निराशेतून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शांताराम नागप यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे यांनी तात्काळ त्यागपत्र द्यावे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप पहाता त्यांनी तात्काळ त्यागपत्र द्यायला हवे. भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेच्या वतीने कालच एक पत्रक प्रसिद्ध करून मुंडे यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात आली आहे.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना उपचारासाठी गोव्याबाहेर नेण्याची आवश्यकता नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक सध्या बोलू शकत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना पुढील २४ घंटे निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांचा ‘व्हेंटिलेटर सपोर्ट’ही काढण्यात आला आहे आणि त्यांना ‘हाय फ्लो नेसल ऑक्सीजन’वर ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानासाठी स्थानिक सुट्टी

जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ दिवशी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. हा दिवस  कार्यालयीन कामकाजाचा दिवस आहे.

‘बर्ड फ्ल्यू’चा संसर्ग आणि प्रसार होऊ नये, यासाठी सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

राज्यातील परभणी जिल्ह्यात कोंबड्या आणि कावळे यांचा ‘बर्ड फ्ल्यूू’ च्या संसर्गाने मृत्यू झाल्याचे शासनाने घोषित केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या रोगाचा संसर्ग आणि प्रसार होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील कुक्कुटपालक आणि नागरिक यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

शाकंभरी नवरात्रोत्सवात मोजके सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत होणार धार्मिक विधी

आठ दिवसांच्या मंचकी निद्रेनंतर २१ जानेवारीच्या पहाटे श्री तुळजाभवानीदेवी सिंहासनावर विराजमान होईल.

महिलेने केलेले सर्व आरोप खोटे असून माझी अपकीर्ती करणारे आहेत ! – धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप करून मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली होती; मात्र मुंडे यांनी या महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत.

खारेपाटण ते झाराप महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २ मासांत होणार ! – खासदार विनायक राऊत

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून नांदगाव, तळेरे, कासार्डे, कणकवली या ठिकाणच्या पुलांची कामे शिल्लक आहेत. ही कामे येत्या मासात मार्गी लागल्यानंतर दोन मासांत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लोकार्पणासाठी सज्ज होईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

राज्य कोरोना लसीकरणासाठी सिद्ध

लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरवण्यात आले असून पहिल्या गटात हेल्थ केअर वर्कर्सचा समावेश आहे.