प्रभावशाली व्यक्तींनी भाषण स्वातंत्र्याचा वापर करतांना दायित्वाने वागावे ! – सर्वोच्च न्यायालय

प्रभावशाली व्यक्तींनी भाषण स्वातंत्र्याचा वापर करतांना दायित्वाने वागावे ! – सर्वोच्च न्यायालय

आज देशात भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या नावाखाली व्यक्तीच्या चारित्र्यासह धर्मांवर शिंतोडे उडवले जात आहेत. हे रोखण्यासाठी आणि संबंधितांना कठोर शिक्षा होण्यासाठी न्यायालयाने प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते !

६० व्या गोवा मुक्तीदिनाच्या वर्षभराच्या कार्यक्रमासाठी ‘लोगो’ सिद्ध करण्यासाठी अर्ज मागवले

६० व्या गोवा मुक्तीदिनाच्या वर्षभराच्या कार्यक्रमासाठी ‘लोगो’ सिद्ध करण्यासाठी अर्ज मागवले

इच्छुकांनी हा लोगो ‘[email protected]’वर ई-मेल करायचा आहे आणि सोबत संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक द्यायचा आहे.

वाळू तस्करीवर नियंत्रण कधी ?

वाळू तस्करीवर नियंत्रण कधी ?

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर वाळू तस्करांकडून सशस्त्र आक्रमण केले जाते. त्यांच्याकडे शस्त्रे कुठून येतात ? महसूल विभागाचे पथक कारवाईसाठी येणार असल्याची माहिती या मंडळींना कशी मिळते ? तसेच कायदा-सुव्यवस्था मोडीत काढण्याचे धाडस या लोकांकडे कुठून येते ?

देहलीमधील एका नाल्यातून मोठ्या प्रमाणात गायींचे अवशेष सापडले

देहलीमधील एका नाल्यातून मोठ्या प्रमाणात गायींचे अवशेष सापडले

अशा प्रकारच्या घटना घडतात, हे पोलीस आणि शासनयंत्रणा यांना लज्जास्पद ! गोहत्या करणार्‍यांना तात्काळ शिक्षा होण्यासाठी देशात त्यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करून तेथे जलद गतीने खटले चालवणे आवश्यक आहे !

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे येथे ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद, तर कोकणात प्रतिसाद नाही

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे येथे ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद, तर कोकणात प्रतिसाद नाही

केंद्रसरकारने कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी घोषित केलेल्या ‘बंद’ला मुंबईसह नवी मुंबई, ठाणे येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते ‘बंद’मध्ये सहभागी झाले होते.

हिंदूंवर धर्माचे संस्कार करण्याचे दायित्व धर्मगुरुंचे !

हिंदूंवर धर्माचे संस्कार करण्याचे दायित्व धर्मगुरुंचे !

हिंदूंवर धर्माचे संस्कार करण्याचे दायित्व ‘धर्मगुरु’ आणि ‘रामानंदाचार्य’ यांचे असते. ते कधीही त्यांचा मठ अन् आश्रम सोडून जनतेत मिसळले नाहीत. त्यामुळे हिंदूंना ‘धर्म म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय ?’, याविषयी ज्ञानच मिळाले नाही.

आतंकवादविरोधी ‘मॉक ड्रिल’मध्ये ‘ग्रेनेड’च्या स्फोटात हवालदार घायाळ

आतंकवादविरोधी ‘मॉक ड्रिल’मध्ये ‘ग्रेनेड’च्या स्फोटात हवालदार घायाळ

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन ‘सुपर स्पेशालिटी’ विभागाजवळ ८ डिसेंबर या दिवशी सकाळी ‘ग्रेनेड’ स्फोटाचा ‘मॉक ड्रिल’ (रंगीत तालिम) करतांना गोवा पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकातील पोलीस हवालदार जयदेव सावंत घायाळ झाला.

उसगाव येथील शिक्षिका कोरोनाबाधित

उसगाव येथील शिक्षिका कोरोनाबाधित

ज्येष्ठ शिक्षिका कोरोनाबाधित झाल्याने उसगाव, फोंडा येथील विद्यालयाचे इयत्ता १० वी आणि १२ वीचे वर्ग एक आठवड्यासाठी रहित करण्यात आले आहेत.

आंबोली येथे ११ डिसेंबरला ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा होणार

आंबोली येथे ११ डिसेंबरला ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा होणार

११ डिसेंबर या ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’च्या दिवशी सकाळी १० वाजता सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील महादेवगड पॉईंट येथे ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ संस्थेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी पर्वतपूजन आणि मार्गदर्शन असे कार्यक्रम होणार आहेत.

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

ग्रहदोषांमुळे होणार्‍या दुष्परिणामांच्या निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात जप, दान, शांती, रत्न धारण करणे इत्यादी उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने दुष्परिणामांची तीव्रता काही प्रमाणात न्यून होण्यास साहाय्य होते; परंतु हे उपाय तत्कालीक परिणाम करतात.